शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तांदुळवाडीत हाणामारी

By admin | Updated: December 29, 2016 23:48 IST

क्रिकेटचा वाद : चारचाकीवर दगडफेक; लाखाचे नुकसान

कुरळप/येलूर/तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे तांदुळवाडी व मालेवाडी येथील युवकांमध्ये तीन दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सामन्यावेळी वाद झाला होता. त्याचे पर्यवसान बुधवारी धुमश्चक्रीत झाले. भांडण मिटवायला आलेल्यांमध्ये वादावादी सुरू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, मालेवाडीसाठी असलेल्या पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलचे अज्ञातांनी नुकसान केले.याबाबत रणजित हंबीरराव खवरे (वय ३३, रा. मालेवाडी) यांनी तांदुळवाडी येथील १२ जणांविरोधात कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे. भांडणावेळी खवरे यांच्या चारचाकी गाडीवर केलेल्या दगडफेकीत त्यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.तांदुळवाडी येथे तीन दिवसांपूर्वी क्रिकेट स्पर्धा झाल्या. यामध्ये मालेवाडीतील मुलांचे तांदुळवाडीच्या मुलांबरोबर भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी मालेवाडीतील रणजित खवरे मित्रासह तांदुळवाडीत बुधवारी रात्री आले होते. त्यावेळी तांदुळवाडीतील पोलिसपाटील यांचे पती राजाराम वसंत पाटील, नंदकुमार गुरव, दिग्विजय लक्ष्मण मोहिते, हर्षल अशोक पाटील, हर्षल सर्जेराव सावंत, विजय यशवंत कोळी, कृष्णात पांडुरंग पाटील, आनंदराव सखाराम पाटील (सर्व रा. तांदुळवाडी) यांनी खवरे यांच्या चारचाकी गाडीवर (एमएच १0 बीडब्ल्यू ५३११) दगडफेक केली. त्यामुळे गाडीच्या काचा फुटून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेनंतर दोन्ही गावांमध्ये तणाव निर्माण झाला असून, कुरळप पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तांदुळवाडी येथील राजाराम वसंत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. मालेवाडीसाठी नदीवर असलेल्या राजारामबापू पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलच्या इमारतीचा दरवाजा व वायरी तोडण्यात आल्या आहेत. फ्युजही काढून नेल्या आहेत. हा प्रकार नेमका कोणी केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (वार्ताहर)गाव बंदची हाकपोलिसपाटलांचे पती राजाराम वसंत पाटील यांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ तांदुळवाडी येथील त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी ‘गाव बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले होते. सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.तांदुळवाडी-मालेवाडी वाद जुनाचगेल्या सहा वर्षांपासून तांदुळवाडी व मालेवाडी येथील दोन गटांत वादाचे प्रकार घडत आहेत. या ना त्या कारणावरून वादाला तोंड फुटते. त्यामुळेच तांदुळवाडी येथील स्थानिकांनी मालेवाडी येथील व्यावसायिकांना तांदुळवाडीत व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे.