शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

किस्से, कहाण्यांमधून पवारांचा यशोमंत्र

By admin | Updated: January 11, 2016 00:46 IST

कार्यक्रमात रंगत : सांगलीची रेश्मा, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांची यशोगाथा

सांगली : अनेक किस्से, कहाण्यांचा अनुभव कथन करीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी सांगलीत, कोणत्याही क्षेत्रात कसे यशस्वी होता येते, याचा मंत्र दिला. सांगलीची रेश्मा पाटील, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांच्या विदेशातील कर्तृत्वाचा प्रवास मांडताना त्यांनी, संकटांवर मात करा आणि यशस्वी व्हा, असा सल्लाही दिला. सांगलीतील यंगमेन्स सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी असली आणि संकटावर मात करण्याची हिम्मत असेल तर, तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठीच्या या गोष्टी अंगी बाळगल्या पाहिजेत. जगाच्या पाठीवर प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठणारे लोक प्रवासात अनेकदा भेटले. त्यांच्या कहाण्या ऐकून मीही थक्क झालो. इंग्लंडच्या दौऱ्यात असताना एका भारतीय हॉटेलमध्ये मी जेवणासाठी गेलो होतो. त्यावेळी जेवणाच्या ताटाबरोबर चार तळलेल्या मिरच्याही त्याठिकाणी ठेवल्या गेल्या. मी आश्चर्यचकित झालो. ‘या मिरच्या इथे कोणी ठेवल्या?’, असा सवाल मी केला. त्यावर एक तरुणी त्याठिकाणी आली आणि तिनेच त्या मिरच्या ठेवल्याचे सांगितले. आपल्याकडील लोकांना तळलेल्या मिरच्या तोंडाला लागल्याशिवाय जेवणाची चव लागत नाही, असेही तिने सांगितले. रेश्मा पाटील असे तिचे नाव होते. ती सांगली जिल्ह्यातील होती. पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिने त्या हॉटेलमधील नोकरी स्वीकारली होती. कऱ्हाड तालुक्यातील डांगे नावाचे एक गृहस्थही न्यूयॉर्कला भेटले. ते मराठीतच बोलत होते. माझ्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि घरी जेवणाचे निमंत्रण दिले. त्यांचे घर लांब असल्याने माझ्या कार्यक्रमातून वेळ काढून तेवढ्या लांब जाणे शक्य नव्हते. ही गोष्ट जेव्हा त्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी विमान पाठवून देऊ का, असे विचारले. मला धक्काच बसला. तुमचा उद्योग तरी काय आहे? असे त्यांना मी विचारले. अमेरिकन एअरफोर्सला लागणारे स्पेअरपार्टस् बनविणाऱ्या कंपनीचे ते मालक होते. कऱ्हाड तालुक्यातील एक साधा माणूस जर अमेरिकेसारख्या देशात स्वत:ची भली मोठी कंपनी उभी करू शकत असेल, तर कोणालाही ही गोष्ट साध्य होऊ शकते. जगाच्या पाठीवर काम करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. शाळेत मी किती कच्चा होतो कळलं का?व्यक्तिगत अमृतमहोत्सव आणि संस्थात्मक अमृतमहोत्सवाची तुलना करताना शरद पवारांनी, भा. रा. तांबे यांच्या ‘रिकामे मधुघट’ या कवितेची आठवण करून दिली. ‘ढळला रे ढळला दिन सखया’ ही एकच ओळ कशीबशी म्हणून त्यांनी उपस्थितांनाच, ‘पुढच्या ओळी काय?’, अशी विचारणा केली. त्यावर सारेच शांत बसले. ‘शाळेत मी किती कच्चा होतो, हे तुम्हाला यावरून कळले असेल’, असे पवार म्हणाले आणि उपस्थितांत हशा पिकला. देणेकऱ्यांचा तगादा : देशच सोडला...टोकियोला विमानतळावर उतरलो, तेव्हा एका माणसाने मला ‘राम राम साहेब’, म्हणून हाक दिली. मी लगेच ओळखले की, हा नक्कीच आपल्या गावाकडचा असणार. त्याने तो उस्मानाबादचा देशमुख असल्याचे सांगितले. त्याची कहाणीही थक्क करणारी होती. गावातील एका निवडणुकीत या देशमुखांनी वारेमाप खर्च केला होता. तरीही निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर, छपाईवाल्यापासून ते पेट्रोल पंपवाल्यापर्यंत अनेक देणेकऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्यांनी देशच सोडला. सुरुवातीचे काही दिवस स्वित्झर्लंडमध्ये काढून ते जपानच्या टोकियोपर्यंत पोहोचले. दहा बाय वीसच्या जागेत त्यांनी एक रेस्टॉरंट काढले. याठिकाणच्या खिमा-चपातीने जापनीज् लोकांना वेड लावले आणि आता हेच देशमुख तेथे एका मोठ्या हॉटेलचे मालक बनले आहेत, असे पवार म्हणाले.