शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सांगलीमध्ये ‘तळीराम’ सुसाटच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:06 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अनेक प्रकारच्या कारवाईचा ससेमीरा मागे लावूनही नशेत वाहन चालविणाऱ्या सांगलीतील तळीरामांच्या संख्येत घट झालेली नाही. गेल्या १६ महिन्यात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अठराशे तळीरामांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने या तळीरामांकडून २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही आकडेवारी थक्क करणारी आहे.सांगली , ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अनेक प्रकारच्या कारवाईचा ससेमीरा मागे लावूनही नशेत वाहन चालविणाऱ्या सांगलीतील तळीरामांच्या संख्येत घट झालेली नाही. गेल्या १६ महिन्यात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अठराशे तळीरामांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने या तळीरामांकडून २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही आकडेवारी थक्क करणारी आहे.सांगली, मिरजेसह जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी होत असे. पण दारुच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांवर कधीच कारवाई होत नव्हती. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी ही कारवाई सुरु केली. तेव्हापासून या कारवाईत अजूनही सातत्य कायम आहे. जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. पण या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांकडून तळीरामांवर फारशी कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक नियंत्रण शाखा तळीरामांवर कारवाई करण्यात अव्वल ठरली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दारुच्या नशेत वाहन हातात असले की, वेगावर नियंत्रण राहत नाही. सुसाटपणे वाहन चालविले जाते. यातून अपघात होतात. तळीराम स्वत:सह दुसºयाचा जीवही धोक्यात टाकतात.दारूच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांना रात्रभर पोलीस कोठडीत ठेवणे, त्यांची दुचाकी जप्त करणे, न्यायालयामार्फत दंड ठोठावणे, त्यांचे ‘लायसन्स’ निलंबित करणे अशा कारवाया करण्यात येत आहेत.‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्राची मदतपूर्वी दारुच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांवर कारवाई करताना पोलिसांना खूप कसरत करावी लागत होती. संबंधित तळीरामाच्या रक्त व लघवीची तपासणी करावी लागत असे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करावी लागत असे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक पळवाटा काढून तळीरामा सहीसलामत सुटायचे. पण ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्रामुळे वाहनाचा चालक दारू पिऊन गाडी चालवत आहे की नाही, हे लगेच जागेवरच समजते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्र वाहतूक पोलिसांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पुरविण्यात आले आहे.शिक्षेची तरतूदनशेत वाहन चालविल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून जास्तीत जास्त सहा महिने कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्हीही शिक्षा. एखादा याप्रकरणी सापडल्यानंतर पुन्हा तीन वर्षात परत सापडला, तर दोन वर्षे कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्हीही शिक्षा आहेत....तर खटला चालविला जातो!तळीराम सापडले की, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. त्यांची दुचाकी जप्त केली जाते. दुसºयादिवशी न्यायालयात खटला पाठविला जातो. तिथे न्यायाधीशांकडून ‘तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?’, अशी विचारणा केली जाते. ‘कबूल आहे’, असे उत्तर दिले, तर न्यायालयाकडून दंड ठोठावला जातो. ‘गुन्हा कबूल नाही’, असे सांगितले, तर पुढे खटला चालविला जातो.