शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कर्ज घेऊ, पण पाणी देऊ

By admin | Updated: April 23, 2016 00:55 IST

गिरीश महाजन : मानकरवाडी तलावात ‘वाकुर्डे’च्या पाण्याचे पूजन

शिराळा : युती शासनास शेतकऱ्यांसाठी कितीही कर्ज घ्यावे लागले तरी चालेल, ते कर्ज घेऊन येत्या दोन वर्षात अपुऱ्या सर्व पाणी योजना पूर्ण करु, नंतरच नवीन योजना मंजूर करु, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे मानकरवाडी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन व वचनपूर्ती निर्णय आयोजित शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.महाजन म्हणाले की, पाण्याचे महत्त्व शेतकऱ्यांनाच समजते. या मतदारसंघात दुष्काळ भीषण आहे हे पाहिले आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करील. याअगोदरच्या शासनाने ७० हजार कोटी खर्च केले. मात्र शेतकऱ्यांना पाणीच नाही मिळाले. त्यांनी नियोजन केले नाही. त्यांच्या शासनातील अनेक गडबड घोटाळे बाहेर येत आहेत. एक माजी मंत्री तुरुंं गात आहेत. बाकीचे तुरुंगात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधी देणे गरजेचे आहे. हे पैसे मिळाले तरच हा विभाग सुजलाम सुफलाम होईल. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खासदार राजू शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, राहुल महाडिक, विक्रमभाऊ पाटील, सदाभाऊ खोत, अभिजित नाईक, सर्जेराव यादव, सत्यजित नाईक, विजयराव यादव, उत्तमराव निकम, यशवंत दूध संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.सुखदेव पाटील यांनी स्वागत केले, रणधीर नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)