शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

बेदाणा व्यापाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Updated: April 30, 2016 00:52 IST

बाजार समितीचा निर्णय : बाजार समिती प्रशासन-व्यापाऱ्यांत बैठक

सांगली : खरेदीदारांकडून वेळेत पेमेंट येत नसल्यामुळे अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे देण्यास विलंब होत आहे. यामुळे अडचणी निर्माण होत असून खरेदीदार व्यापाऱ्यांकडून ४० दिवसात पेमेंट न आल्यास ‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बाजार समिती प्रशासन व अडते-व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बाजार समितीने ठाम भूमिका घेत तोडगा काढावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. पेमेंटच्या विलंबाबाबत समितीने बेदाणा व्यापारी व अडते यांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. खरेदीदार व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ७५ दिवसांपर्यंत उशिरा रक्कम मिळत आहे. ३५ ते ४० दिवसात रक्कम देण्याचा नियम असताना, रक्कम उशिरा मिळत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाजार समितीने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी अडते-व्यापाऱ्यांनी केली. यावेळी तारीख ते तारीख पेमेंट मिळावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. ८० ते ९० दिवसात जर पेमेंट मिळणार असेल, तर सौदे बंद करण्याचा इशाराच यावेळी व्यापाऱ्यांनी दिला. बाजार समितीने याबाबत ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. गुळाची रक्कम १५ दिवसात येते, हळदीचे पैसे ३० दिवसात येतात, तर बेदाण्याचीच रक्कम ७५ दिवसांपर्यंत उशिरा का येते? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. सांगली बाजार समितीत स्वतंत्र ‘बॅन कमिटी’ स्थापण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी, ठरलेल्या वेळेत व्यापाऱ्यांची रक्कम न देणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. शनिवारी पुन्हा सभापती संतोष पाटील यांच्या उपस्थितीत यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)