शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

बेदाणा व्यापाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Updated: April 30, 2016 00:52 IST

बाजार समितीचा निर्णय : बाजार समिती प्रशासन-व्यापाऱ्यांत बैठक

सांगली : खरेदीदारांकडून वेळेत पेमेंट येत नसल्यामुळे अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे देण्यास विलंब होत आहे. यामुळे अडचणी निर्माण होत असून खरेदीदार व्यापाऱ्यांकडून ४० दिवसात पेमेंट न आल्यास ‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बाजार समिती प्रशासन व अडते-व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बाजार समितीने ठाम भूमिका घेत तोडगा काढावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. पेमेंटच्या विलंबाबाबत समितीने बेदाणा व्यापारी व अडते यांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. खरेदीदार व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ७५ दिवसांपर्यंत उशिरा रक्कम मिळत आहे. ३५ ते ४० दिवसात रक्कम देण्याचा नियम असताना, रक्कम उशिरा मिळत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाजार समितीने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी अडते-व्यापाऱ्यांनी केली. यावेळी तारीख ते तारीख पेमेंट मिळावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. ८० ते ९० दिवसात जर पेमेंट मिळणार असेल, तर सौदे बंद करण्याचा इशाराच यावेळी व्यापाऱ्यांनी दिला. बाजार समितीने याबाबत ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. गुळाची रक्कम १५ दिवसात येते, हळदीचे पैसे ३० दिवसात येतात, तर बेदाण्याचीच रक्कम ७५ दिवसांपर्यंत उशिरा का येते? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. सांगली बाजार समितीत स्वतंत्र ‘बॅन कमिटी’ स्थापण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी, ठरलेल्या वेळेत व्यापाऱ्यांची रक्कम न देणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. शनिवारी पुन्हा सभापती संतोष पाटील यांच्या उपस्थितीत यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)