शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

ताकारी, टेंभूची पाणीपट्टी यंदा जुन्या दरानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:43 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू व ताकारी जलसिंचन योजनांच्या पाणीपट्टीसाठी राज्य ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू व ताकारी जलसिंचन योजनांच्या पाणीपट्टीसाठी राज्य शासनाने ८१-१९ चा फॉर्म्युला जाहीर केला असला तरी, पाटबंधारे विभागाकडून २०१७-१८ हे वर्ष पुढे करून ऊस पिकासाठी जुन्या दरानेच पाणीपट्टीची वसुली सुरू केली आहे. ८१-१९ चा हा नवा फॉर्म्युला आॅक्टोबर २०१९ च्या गळीत हंगामापासून लागू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या वृत्ताला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी तालुक्यांसाठी ताकारी व टेंभू योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे. परंतु, वीज बिल व देखभाल दुरूस्तीच्या खर्चाअभावी या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच दुष्काळी भागातील शेतकºयांनाही पाणीपट्टीची रक्कम भरमसाट द्यावी लागत असल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे.राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनांचा खर्च एकट्या शेतकºयाच्या खांद्यावर टाकण्यापेक्षा त्यातील काही हिस्सा राज्य शासनाने उचलावा, यासाठी आ. अनिल बाबर, सांगोल्याचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विधानसभा अधिवेशनात आवाज उठविला. त्यावेळी राज्य शासन ८१ टक्के व शेतकºयांकडून पाणीपट्टीच्या माध्यमातून १९ टक्के रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला. याबाबतचा अध्यादेश जानेवारी २०१८ ला काढण्यात आला.पाटबंधारे विभागाकडून जुलै ते जून अशी पाणीपट्टीची आकारणी होत असते. त्यामुळे जुलै २०१७ ते जून २०१८ ची पाणीपट्टीची आकारणी यापूर्वीच झाल्याने पाटबंधारे विभागाने जुन्या दरानेच पाणीपट्टी वसुलीसाठी सोनहिरा, केन अ‍ॅग्रो, सह्याद्री, नागेवाडी, गोपूज, क्रांती, विराज व उदगिरी या कारखान्यांना पाणीपट्टी वसुलीसाठी याद्या दिल्या आहेत. ंत्यामुळे चालू गळीत हंगामातील ऊस पिकाच्या पाणीपट्टीची वसुली ८१-१९ या फॉर्म्युल्याऐवजी जुन्या म्हणजे प्रतिहेक्टरी २२ हजार ३४३ रुपये दराने केली जात आहे. यामुळे शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.