शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

By admin | Updated: May 11, 2017 23:20 IST

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव, पलूस, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही तब्बल ५३३ कोटी रुपये इतक्या निधीची गरज आहे. १,१७८ कोटींचा चतुर्थ सुधारित प्रकल्प अहवाल योजनेकडून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. ताकारी योजनेवर आतापर्यंत झालेला ६४५ कोटींचा खर्च व चौथ्या अहवालानुसार यापुढे मिळणारा ५३३ कोटींचा निधी अशाप्रकारे योजना आता ११७८ कोटी इतक्या खर्चाची होत आहे. ताकारी योजनेचे १०८ कि.मी. पुणदीपर्यंतचे (तालुका तासगाव) मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ताकारी योजना ९ हजार ५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देत आहे. १०८ ते १४४ कि.मी. अशा ३६ कि.मी. अंतरातील मुख्य कालवा तसेच चिंचणी भरण कालवा अस्तरीकरण, सोनसळ डावा कालवा, वितरिका आणि उपवितरिका आदी अपूर्ण असलेल्या कामांसाठी तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी मंजूर होणे आवश्यक आहे. निधी मंजूर होऊन अपूर्ण कामे पूर्ण झाली, तर २७ हजार ४३० हेक्टर इतके लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत ताकारी योजनेवर ६४५ कोटी खर्च झाला आहे.योजनेला पहिल्या प्रकल्प अहवालापासून आजवर टप्प्या-टप्प्याने निधी मिळत गेला. आतापर्यंत योजनेला मिळालेल्या निधीतून १०८ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा तसेच ११ कि.मी. लांबीचा चिंचणी भरण कालवा, २३ किलोमीटर लांबीचा सोनसळ डावा कालवा तडसर हद्दीपर्यंत यासह योजनेचे ४ टप्पे, भूमिसंपादन आदी कामांसाठी ६४५ कोटी इतका खर्च झाला आहे. आजअखेर जवळपास ९,५०० हेक्टर इतक्या शेतजमिनीला पाणी देण्यात आले आहे.ही योजना चार टप्प्यात दुष्काळी भागाला ९.३४ टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून उचलून देणार आहे. या योजनेच्या उर्वरित कामासाठी ५३३ कोटींचा निधी मिळाल्यास योजना पूर्णत्वाकडे जाईल आणि सद्यस्थितीला तसेच वंचित लाभक्षेत्राचे नंदनवन करेल. प्रधानमंत्री योजनेत समावेशाने दिलासा मागीलवर्षी ताकारी तसेच म्हैसाळ योजनेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेतूनही ताकारी प्रकल्पासाठी भरीव निधी मिळेल. देशातील अपूर्ण सिंचन योजना येत्या ४ वर्षांत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री सिंचन योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे ताकारी योजनेला दिलासा मिळाला आहे.चौथ्या प्रकल्प अहवालास लवकरच मंजुरी ताकारी योजनेचा शासनाकडे सादर झालेला चौथा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या अहवालास मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मान्यता मिळणार आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली.