शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

By admin | Updated: May 11, 2017 23:20 IST

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव, पलूस, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही तब्बल ५३३ कोटी रुपये इतक्या निधीची गरज आहे. १,१७८ कोटींचा चतुर्थ सुधारित प्रकल्प अहवाल योजनेकडून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. ताकारी योजनेवर आतापर्यंत झालेला ६४५ कोटींचा खर्च व चौथ्या अहवालानुसार यापुढे मिळणारा ५३३ कोटींचा निधी अशाप्रकारे योजना आता ११७८ कोटी इतक्या खर्चाची होत आहे. ताकारी योजनेचे १०८ कि.मी. पुणदीपर्यंतचे (तालुका तासगाव) मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ताकारी योजना ९ हजार ५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देत आहे. १०८ ते १४४ कि.मी. अशा ३६ कि.मी. अंतरातील मुख्य कालवा तसेच चिंचणी भरण कालवा अस्तरीकरण, सोनसळ डावा कालवा, वितरिका आणि उपवितरिका आदी अपूर्ण असलेल्या कामांसाठी तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी मंजूर होणे आवश्यक आहे. निधी मंजूर होऊन अपूर्ण कामे पूर्ण झाली, तर २७ हजार ४३० हेक्टर इतके लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत ताकारी योजनेवर ६४५ कोटी खर्च झाला आहे.योजनेला पहिल्या प्रकल्प अहवालापासून आजवर टप्प्या-टप्प्याने निधी मिळत गेला. आतापर्यंत योजनेला मिळालेल्या निधीतून १०८ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा तसेच ११ कि.मी. लांबीचा चिंचणी भरण कालवा, २३ किलोमीटर लांबीचा सोनसळ डावा कालवा तडसर हद्दीपर्यंत यासह योजनेचे ४ टप्पे, भूमिसंपादन आदी कामांसाठी ६४५ कोटी इतका खर्च झाला आहे. आजअखेर जवळपास ९,५०० हेक्टर इतक्या शेतजमिनीला पाणी देण्यात आले आहे.ही योजना चार टप्प्यात दुष्काळी भागाला ९.३४ टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून उचलून देणार आहे. या योजनेच्या उर्वरित कामासाठी ५३३ कोटींचा निधी मिळाल्यास योजना पूर्णत्वाकडे जाईल आणि सद्यस्थितीला तसेच वंचित लाभक्षेत्राचे नंदनवन करेल. प्रधानमंत्री योजनेत समावेशाने दिलासा मागीलवर्षी ताकारी तसेच म्हैसाळ योजनेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेतूनही ताकारी प्रकल्पासाठी भरीव निधी मिळेल. देशातील अपूर्ण सिंचन योजना येत्या ४ वर्षांत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री सिंचन योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे ताकारी योजनेला दिलासा मिळाला आहे.चौथ्या प्रकल्प अहवालास लवकरच मंजुरी ताकारी योजनेचा शासनाकडे सादर झालेला चौथा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या अहवालास मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मान्यता मिळणार आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली.