शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

By admin | Updated: May 11, 2017 23:20 IST

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव, पलूस, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही तब्बल ५३३ कोटी रुपये इतक्या निधीची गरज आहे. १,१७८ कोटींचा चतुर्थ सुधारित प्रकल्प अहवाल योजनेकडून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. ताकारी योजनेवर आतापर्यंत झालेला ६४५ कोटींचा खर्च व चौथ्या अहवालानुसार यापुढे मिळणारा ५३३ कोटींचा निधी अशाप्रकारे योजना आता ११७८ कोटी इतक्या खर्चाची होत आहे. ताकारी योजनेचे १०८ कि.मी. पुणदीपर्यंतचे (तालुका तासगाव) मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ताकारी योजना ९ हजार ५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देत आहे. १०८ ते १४४ कि.मी. अशा ३६ कि.मी. अंतरातील मुख्य कालवा तसेच चिंचणी भरण कालवा अस्तरीकरण, सोनसळ डावा कालवा, वितरिका आणि उपवितरिका आदी अपूर्ण असलेल्या कामांसाठी तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी मंजूर होणे आवश्यक आहे. निधी मंजूर होऊन अपूर्ण कामे पूर्ण झाली, तर २७ हजार ४३० हेक्टर इतके लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत ताकारी योजनेवर ६४५ कोटी खर्च झाला आहे.योजनेला पहिल्या प्रकल्प अहवालापासून आजवर टप्प्या-टप्प्याने निधी मिळत गेला. आतापर्यंत योजनेला मिळालेल्या निधीतून १०८ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा तसेच ११ कि.मी. लांबीचा चिंचणी भरण कालवा, २३ किलोमीटर लांबीचा सोनसळ डावा कालवा तडसर हद्दीपर्यंत यासह योजनेचे ४ टप्पे, भूमिसंपादन आदी कामांसाठी ६४५ कोटी इतका खर्च झाला आहे. आजअखेर जवळपास ९,५०० हेक्टर इतक्या शेतजमिनीला पाणी देण्यात आले आहे.ही योजना चार टप्प्यात दुष्काळी भागाला ९.३४ टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून उचलून देणार आहे. या योजनेच्या उर्वरित कामासाठी ५३३ कोटींचा निधी मिळाल्यास योजना पूर्णत्वाकडे जाईल आणि सद्यस्थितीला तसेच वंचित लाभक्षेत्राचे नंदनवन करेल. प्रधानमंत्री योजनेत समावेशाने दिलासा मागीलवर्षी ताकारी तसेच म्हैसाळ योजनेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेतूनही ताकारी प्रकल्पासाठी भरीव निधी मिळेल. देशातील अपूर्ण सिंचन योजना येत्या ४ वर्षांत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री सिंचन योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे ताकारी योजनेला दिलासा मिळाला आहे.चौथ्या प्रकल्प अहवालास लवकरच मंजुरी ताकारी योजनेचा शासनाकडे सादर झालेला चौथा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या अहवालास मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मान्यता मिळणार आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली.