शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

By admin | Updated: May 11, 2017 23:20 IST

‘ताकारी’ला हवेत ५३३ कोटी

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव, पलूस, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही तब्बल ५३३ कोटी रुपये इतक्या निधीची गरज आहे. १,१७८ कोटींचा चतुर्थ सुधारित प्रकल्प अहवाल योजनेकडून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. ताकारी योजनेवर आतापर्यंत झालेला ६४५ कोटींचा खर्च व चौथ्या अहवालानुसार यापुढे मिळणारा ५३३ कोटींचा निधी अशाप्रकारे योजना आता ११७८ कोटी इतक्या खर्चाची होत आहे. ताकारी योजनेचे १०८ कि.मी. पुणदीपर्यंतचे (तालुका तासगाव) मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ताकारी योजना ९ हजार ५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देत आहे. १०८ ते १४४ कि.मी. अशा ३६ कि.मी. अंतरातील मुख्य कालवा तसेच चिंचणी भरण कालवा अस्तरीकरण, सोनसळ डावा कालवा, वितरिका आणि उपवितरिका आदी अपूर्ण असलेल्या कामांसाठी तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी मंजूर होणे आवश्यक आहे. निधी मंजूर होऊन अपूर्ण कामे पूर्ण झाली, तर २७ हजार ४३० हेक्टर इतके लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत ताकारी योजनेवर ६४५ कोटी खर्च झाला आहे.योजनेला पहिल्या प्रकल्प अहवालापासून आजवर टप्प्या-टप्प्याने निधी मिळत गेला. आतापर्यंत योजनेला मिळालेल्या निधीतून १०८ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा तसेच ११ कि.मी. लांबीचा चिंचणी भरण कालवा, २३ किलोमीटर लांबीचा सोनसळ डावा कालवा तडसर हद्दीपर्यंत यासह योजनेचे ४ टप्पे, भूमिसंपादन आदी कामांसाठी ६४५ कोटी इतका खर्च झाला आहे. आजअखेर जवळपास ९,५०० हेक्टर इतक्या शेतजमिनीला पाणी देण्यात आले आहे.ही योजना चार टप्प्यात दुष्काळी भागाला ९.३४ टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून उचलून देणार आहे. या योजनेच्या उर्वरित कामासाठी ५३३ कोटींचा निधी मिळाल्यास योजना पूर्णत्वाकडे जाईल आणि सद्यस्थितीला तसेच वंचित लाभक्षेत्राचे नंदनवन करेल. प्रधानमंत्री योजनेत समावेशाने दिलासा मागीलवर्षी ताकारी तसेच म्हैसाळ योजनेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेतूनही ताकारी प्रकल्पासाठी भरीव निधी मिळेल. देशातील अपूर्ण सिंचन योजना येत्या ४ वर्षांत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री सिंचन योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे ताकारी योजनेला दिलासा मिळाला आहे.चौथ्या प्रकल्प अहवालास लवकरच मंजुरी ताकारी योजनेचा शासनाकडे सादर झालेला चौथा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या अहवालास मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मान्यता मिळणार आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळाली.