शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अंकलगीकरांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 11, 2017 00:23 IST

पाण्याची भीषण टंचाई : टँकर मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पाणी पातळीत घट

गजानन पाटील ल्ल संखपाणी-पाणीऽऽ असा टाहो फोडत असलेल्या जत तालुक्यातील अंकलगी गावाला शासनानेही वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने दोन टॅँकरच्या मागणीचा प्रस्ताव देऊनही प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आसपासच्या ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटल्याने उन्हातानातून भटकण्याची वेळ आली आहे.पूर्व भागातील अंकलगी या गावाची लोकसंख्या ३ हजार ६७० आहे. गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना आहे. गेल्या दोन वर्षापासून पाऊसच झाला नसल्याने तलावही कोरडा पडला आहे. पाण्याअभावी विंधन विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षी परतीच्या मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पाण्याची पातळी ६०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. गावामध्ये १४ हातपंप व विंधन विहिरीतून पाणीपुरवठा सुरु होता. तेही पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. अंकलगी व परिसरातील वाडी-वस्तीवरही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. शाळकरी मुलांना सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. वयोवृध्दांनाही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दिवसातील बराच वेळ पाण्यासाठीच खर्च करावा लागत आहे.पाणी कुठून मिळवायचे?अंकलगी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या शासनदरबारी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. टॅँकरची मागणी करुनही टॅँकरने पाणी देण्यास शासन तयार नाही. पाणी कुठून मिळवायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसेच गावाला टॅँकर सुरु झाला तरी, पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न पडल्याची माहिती सरपंच सविता तेली यांनी दिली. टॅँकर मागणीचा प्रस्ताव दिल्याचीही माहिती त्यांनी दिली.तलावाने फिरवली पाठगावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावकामगार तलाठी हे गेल्या अनेक दिवसांपासून सात-बारा आॅनलाईन करायचा आहे, म्हणून गावात येत नाहीत. पाणी टंचाईची माहिती प्रशासनाला मिळत नाही. अहवाल पाठविला जात नाही. नागरिकांचा सात-बारा उतारा नोंदी आदी कामेही प्रलंबित आहेत आणि टंचाईबरोबर नागरिकांचे हाल सुरु आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन टॅँकर सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.साठवण तलाव कोरडागेल्या चार वर्षापासून पुरेसा पाऊस न झाल्याने साठवण तलाव दोन वर्षापासून कोरडा पडला आहे. तलावातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव कोरडा पडल्याने पिके वाळून केली आहेत.