शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर खाट ठेवल्यावरून स्वप्नीलचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील भोरा म्हसोबा मंदिराजवळ तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील भोरा म्हसोबा मंदिराजवळ तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आठ जणांना सांगली ग्रामीण पाेलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री स्वप्नील दशरथ कांबळे (वय २६, रा. कर्नाळ) याचा खून करण्यात आला होता. घरासमोर खाट ठेवल्याचा जाब विचारल्यावरून झालेल्या वादावादीतून ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी मुख्य हल्लेखोर प्रणव ऊर्फ पण्या प्रकाश माने (वय २०, रा. कर्नाळ), साथीदार अनिरुद्ध संजय माने (वय १९), अभिषेक नितीन धोत्रे (१९), प्रीतम ऊर्फ अर्पण राजू सरोदे ऊर्फ धोत्रे (वय १८), गौरव प्रमोद घाडगे (वय २०) आणि रतन ऊर्फ रोहित मोहन वाघमारे (२३, सर्व रा. कुपवाड), अशी त्यांची नावे आहेत.

स्वप्नील कांबळे हा कर्नाळमध्ये राहण्यास होता. मंगळवारी सायंकाळी संशयित प्रणव माने आणि स्वप्नील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर स्वप्नील सांगलीला येऊन जेवण घेऊन तो घरी परतला होता. कामानिमित्त पावणेनऊच्या सुमारास तो पुन्हा घरातून बाहेर पडला. याचदरम्यान, मावस भाऊ असलेल्या अनिरुद्धला मुख्य संशयिताने बोलावून घेतले होते.

रात्री पावणेनऊच्या सुमारास भोरा म्हसोबा मंदिराजवळ स्वप्नीलला गाठत संशयितांनी वादावादी सुरू केली. यात वाद वाढल्यानंतर संशयितांनी स्वप्नीलच्या छातीवर, डोक्‍यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तो पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. स्वप्नीलला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सर्व संशयितांना ताब्यात घेतले. यातील दोन अल्पवयीन आहेत. सहा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, पो.कॉ. संदीप मोरे, महेश जाधव, कपिल साळुंखे, सचिन मोरे यांच्या पथकाने संशयितांना जेरबंद केले.

चौकट

खाट ठरली खुनाचे निमित्त

मृत स्वप्नील व मुख्य संशयित प्रणव शेजारी आहेत. घराजवळ असलेल्या रस्त्यावर प्रणवने खाट ठेवली होती. मयत स्वप्नीलची बहीण दुचाकीवरून येताना ही खाट तिला लागली होती. यावरून स्वप्नील व प्रणवमध्ये वाद झाला होता. क्षुल्लक कारणावरून संशयितांनी राग मनात धरून स्वप्नीलचा खून केला.