शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ दरासाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

By admin | Updated: May 22, 2015 00:10 IST

इस्लामपूर तहसीलसमोर आंदोलन : शासन, कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी

इस्लामपूर/शिराळा : ऊस उत्पादकांना मार्च, एप्रिलमध्ये गाळप झालेल्या उसाचे बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी बारा साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २०४ कोटी रूपये शेतकऱ्यांचे थकित आहेत. या कारखान्यांनी गळीत हंगाम बंद झाल्यानंतरही बिल न दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी बिल मिळविण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत. यामुळे एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनांकडून होत आहे.संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने कार्यालय परिसर दणाणून गेला होता. उसाची आधारभूत किंमत द्या, दूध दरात वाढ करावी यासह भूमी अधिग्रहण कायद्याबाबत शेतकरी हिताचे निर्णय करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुपारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भास्कर कदम, अ‍ॅड. एस. यु. संदे, भागवत जाधव, जयवंत पाटील, शहाजी पाटील, शिवाजीराव देसाई, गुंडाभाऊ आवटी, बाबासाहेब लादे, तानाजी साठे, बजरंग भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)मिरजेत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमिरज : उसाला हमीभाव व भूमी अधिग्रहण कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मिरजेत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, दूध दरात वाढ करावी, बँक, सोसायटीत घोटाळे करणाऱ्या आरोपींवर कठोर करवाई करावी, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा आदी मागण्या करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी मेंढे, बी. आर. पाटील, महावीर पाटील, संजीव खोलकुंबे, सुरेश माळी, आदिनाथ मोळे, प्रकाश सटाले, जयपाल चौगुले यांच्यासह शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी तहसीलदार किशोर घाडगे यांना मागण्यांचे निवेदन दिले.शिराळ्यात निषेधस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून शासन व साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त केला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने एफआरपीनुसार दर देत असतील तर सांगली जिल्ह्यातील का देत नाहीत, असा सवाल जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी उपस्थित केला. यावेळी राम पाटील, महादेव दिवे, बंडा नांगरे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.