शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून विश्वासघात केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्टला ‘स्वाभिमानी’च्यावतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी सांगितले.

शासनाने महापुरानंतर नुकसान झालेल्या जिरायत पिकाला ६८ रुपये, तर बारमाही बागायती पिकांना १३२ रुपये प्रतिगुंठा नुकसानभरपाई जाहीर करून पूूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोयीचे पुर्नवसन करावे. कृष्णा, वारणा नदीवर कमानी पूल बांधावेत, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि कर्ज माफ व्हावे. वीज बिलातील अवास्तव व्याज रद्द करावे, शेतकऱ्यांचे ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने मिळावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, जगन्नाथ मोरे, राम पाटील, बाळासाहेब जाधव, राजू माने, बाबा सांद्रे, आप्पासाहेब पाटील, शिवाजी मोरे, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, विक्रांत कबुरे उपस्थित होते.