शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून विश्वासघात केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्टला ‘स्वाभिमानी’च्यावतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी सांगितले.

शासनाने महापुरानंतर नुकसान झालेल्या जिरायत पिकाला ६८ रुपये, तर बारमाही बागायती पिकांना १३२ रुपये प्रतिगुंठा नुकसानभरपाई जाहीर करून पूूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोयीचे पुर्नवसन करावे. कृष्णा, वारणा नदीवर कमानी पूल बांधावेत, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि कर्ज माफ व्हावे. वीज बिलातील अवास्तव व्याज रद्द करावे, शेतकऱ्यांचे ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने मिळावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, जगन्नाथ मोरे, राम पाटील, बाळासाहेब जाधव, राजू माने, बाबा सांद्रे, आप्पासाहेब पाटील, शिवाजी मोरे, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, विक्रांत कबुरे उपस्थित होते.