शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून विश्वासघात केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्टला ‘स्वाभिमानी’च्यावतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी सांगितले.

शासनाने महापुरानंतर नुकसान झालेल्या जिरायत पिकाला ६८ रुपये, तर बारमाही बागायती पिकांना १३२ रुपये प्रतिगुंठा नुकसानभरपाई जाहीर करून पूूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोयीचे पुर्नवसन करावे. कृष्णा, वारणा नदीवर कमानी पूल बांधावेत, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि कर्ज माफ व्हावे. वीज बिलातील अवास्तव व्याज रद्द करावे, शेतकऱ्यांचे ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने मिळावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, जगन्नाथ मोरे, राम पाटील, बाळासाहेब जाधव, राजू माने, बाबा सांद्रे, आप्पासाहेब पाटील, शिवाजी मोरे, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, विक्रांत कबुरे उपस्थित होते.