शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची वसंतदादा कारखान्यावर धडक

By admin | Updated: September 18, 2015 23:33 IST

आॅक्टोबरमध्ये बेमुदत उपोषण : ऊस उत्पादकांना ३२ कोटी देण्याची मागणी

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याने दोन्ही गळीत हंगामातील ३२ कोटी रुपयांचे उसाचे बिल शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी कारखान्यावर धडक दिली. दि. ३० सप्टेंबरपर्यंत बिल दिले नाही, तर १ आॅक्टोबरपासून कारखान्यासमोरील वसंतदादांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत एफआरपीनुसार सर्व बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन दिले.वसंतदादा कारखान्याने २०१३-२०१४ या हंगामाअखेरीस ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना एकूण बिलाच्या ६० टक्के, काहींना ४० टक्के, तर काहींना २० टक्के याप्रमाणात बिले दिली. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर बिले देऊ, अशी बोळवण करण्यात आली. मागील थकित बिले मिळतील, या आशेवर शेतकऱ्यांनी पुन्हा २०१४-२०१५ या हंगामात गाळपासाठी ऊस पाठविला, पण आजअखेर कारखान्याने सुमारे दोनशे शेतकऱ्यांना एक रुपायाही बिल दिले नाही. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा, महेश खराडे, सूर्यकांत मोरे, अशोक मगदूम, अनिल पाटील, कुमार पाटील, गोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पलूस तालुक्यातील वसगडे, भिलवडी, अंकलखोप, माळवाडी, खटाव, ब्रह्मनाळ आदी गावांतील शेतकऱ्यांनी वसंतदादा कारखान्यावर मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधले.कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले की, कारखान्यावर २०१३-२०१४ या हंगामातील बिलासाठी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू असल्यामुळे बिल देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरीही केंद्र आणि राज्य शासनाकडून व्याजाच्या हमीवर कर्ज उपलब्ध होणार आहे. या रकमेतून दोन्ही वर्षाची बिले देऊ. दि. ३० सप्टेंबरपर्यंत एफआरपीनुसार पैसे बँकेत खात्यावर वर्ग करण्यात येतील. धडक योजना तोट्यात असतानाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना त्या चालवत आहे. पाणीपट्टी भरा आणि ऊस कुठेही पाठवा, आमची त्याला काही हरकत नाही. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.दरम्यान, संदीप राजोबा यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाने दि. ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले नाहीत, तर १ आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. त्यावेळी पैसे दिल्याशिवाय येथून एकही शेतकरी उठणार नाही. (प्रतिनिधी)मालमत्ता जप्तीचे आदेश मागे घेण्याची मागणी कारखान्याकडे २०१३-१४ वर्षातील गाळपास आलेल्या उसाचे शेतकऱ्यांचे ४५ कोटी रूपये थकित होते. या रकमेसाठीच साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली होती. त्यानुसार मिरज तहसीलदारांनी मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. परंतु, प्रत्यक्षात वर्षभरात महसूल व साखर आयुक्त विभागाकडून कोणतीही प्रक्रिया झाली नाही. शेतकऱ्यांनाही बिल मिळाले नाही. असे असेल तर जप्तीच्या आदेशाला अर्थ काय?, असा सवाल शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यांच्या सुरात सूर मिसळत अध्यक्ष विशाल पाटील यांनीही, ‘मीही हेच म्हणतो की, मालमत्ता जप्तीचे आदेश देऊन प्रश्न सुटणार नाही. तो आदेश प्रशासनाने मागे घ्यावा. बँकेकडून कर्ज उपलब्ध करून लगेच पैसे वर्ग करण्यात येतील,’ असे सांगितले. ४५ कोटीपैकी आतापर्यंत ३० कोटी शेतकऱ्यांना दिले असून केवळ १५ कोटीच शिल्लक आहेत. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे राजोबा यांनी सांगितले.