शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

‘स्वाभिमानी’ला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध

By admin | Updated: October 7, 2016 00:07 IST

इच्छुकांची मोर्चेबांधणी : वाळवा तालुक्यातून चाचपणी सुरु

निवास पवार --शिरटे-- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता खासदारकी आणि मंत्रिपदापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रतिनिधित्वाची ओढ लागली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याकडून गावपातळीवरील कार्यकर्त्यांद्वारे आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत पक्षाची ताकद आणि प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका स्वाभिमानी पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र व लवणमाची येथे झालेल्या संपर्क दौऱ्यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून स्वाभिमानीचे वाळव्यातून जि. प. ला किमान ५ तरी प्रतिनिधी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रशांत होनमाने, मधुकर डिसले, प्रकाश देसाई, डॉ. सचिन पाटील, सुनील सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.ग्रामपंचायतीपासून पं. स. ते जि. प. पर्यंत विकासकामांचा पाठपुरावा करणारी साखळी निर्माण झाली तरच कार्यकर्त्यांचे मोठे जाळे स्वाभिमानीला निर्माण करता येईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेट्टी व खोत यांनी वाटचाल सुरु केली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षात स्वाभिमानीची थार बोथट झाल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. शेट्टी व खोत यांनी दराबाबत बाळगलेले मौन याचीही चर्चा आता उघडपणे सुरु झाली आहे. वसंतदादा सह. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना गत गळीत हंगामातील उसाला एफआरपी तर सोडाच, परंतु १ रुपयाही अदा केलेला नाही. परंतु या दोघांनी याबाबत ब्र शब्दही काढलेला नाही. त्यामुळे कारखाना आणि त्यांच्यात काही सेटलमेंट झाली आहे का? असाही सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.वरील सर्व घडामोडींचा विचार करुन खासदार राजू शेट्टी यांनी गतवर्षी साखरेचा दरच कमी होता, त्यामुळे मिळेल ते पदरात घेण्याची परिस्थिती होती, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र यावेळी साखरेला उच्चांकी दर असून, तो मिळवण्यासाठी आमच्या दोघांची आक्रमकता काय आहे हे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये दाखवून देऊ, असे पटवून दिले जात आहे.केंद्र व राज्य स्तरावर पक्षाचा स्वाभिमानी बाणा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी निवडणुकीपूर्वीच वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कृष्णा काठाने यापूर्वी शेट्टी यांच्या हाकेला अनेकवेळा साथ दिली आहे. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वाभिमानीची डाळ कितपत शिजणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.ऊस परिषेदत : ‘वसंतदादा’चा प्रश्न घ्यावासांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी वसंतदादा सह. साखर कारखान्याला आपला ऊस गळितासाठी पाठवला आहे. परंतु या कारखान्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली आहेत. इतर कारखान्यांनी एफआरपी दिली नाही म्हणून स्वाभिमानीकडून आंदोलन केले जाते. परंतु वसंतदादाने पूर्ण रक्कमच बुडविली त्याचे काय? त्याविरोधात आता ऊस परिषदेत तरी आवाज उठवावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.