शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

‘स्वाभिमानी’ला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध

By admin | Updated: October 7, 2016 00:07 IST

इच्छुकांची मोर्चेबांधणी : वाळवा तालुक्यातून चाचपणी सुरु

निवास पवार --शिरटे-- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता खासदारकी आणि मंत्रिपदापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रतिनिधित्वाची ओढ लागली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याकडून गावपातळीवरील कार्यकर्त्यांद्वारे आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत पक्षाची ताकद आणि प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका स्वाभिमानी पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र व लवणमाची येथे झालेल्या संपर्क दौऱ्यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून स्वाभिमानीचे वाळव्यातून जि. प. ला किमान ५ तरी प्रतिनिधी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष प्रशांत होनमाने, मधुकर डिसले, प्रकाश देसाई, डॉ. सचिन पाटील, सुनील सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.ग्रामपंचायतीपासून पं. स. ते जि. प. पर्यंत विकासकामांचा पाठपुरावा करणारी साखळी निर्माण झाली तरच कार्यकर्त्यांचे मोठे जाळे स्वाभिमानीला निर्माण करता येईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेट्टी व खोत यांनी वाटचाल सुरु केली आहे.गेल्या दोन ते तीन वर्षात स्वाभिमानीची थार बोथट झाल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. शेट्टी व खोत यांनी दराबाबत बाळगलेले मौन याचीही चर्चा आता उघडपणे सुरु झाली आहे. वसंतदादा सह. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना गत गळीत हंगामातील उसाला एफआरपी तर सोडाच, परंतु १ रुपयाही अदा केलेला नाही. परंतु या दोघांनी याबाबत ब्र शब्दही काढलेला नाही. त्यामुळे कारखाना आणि त्यांच्यात काही सेटलमेंट झाली आहे का? असाही सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.वरील सर्व घडामोडींचा विचार करुन खासदार राजू शेट्टी यांनी गतवर्षी साखरेचा दरच कमी होता, त्यामुळे मिळेल ते पदरात घेण्याची परिस्थिती होती, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. मात्र यावेळी साखरेला उच्चांकी दर असून, तो मिळवण्यासाठी आमच्या दोघांची आक्रमकता काय आहे हे होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये दाखवून देऊ, असे पटवून दिले जात आहे.केंद्र व राज्य स्तरावर पक्षाचा स्वाभिमानी बाणा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी निवडणुकीपूर्वीच वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कृष्णा काठाने यापूर्वी शेट्टी यांच्या हाकेला अनेकवेळा साथ दिली आहे. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वाभिमानीची डाळ कितपत शिजणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.ऊस परिषेदत : ‘वसंतदादा’चा प्रश्न घ्यावासांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी वसंतदादा सह. साखर कारखान्याला आपला ऊस गळितासाठी पाठवला आहे. परंतु या कारखान्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली आहेत. इतर कारखान्यांनी एफआरपी दिली नाही म्हणून स्वाभिमानीकडून आंदोलन केले जाते. परंतु वसंतदादाने पूर्ण रक्कमच बुडविली त्याचे काय? त्याविरोधात आता ऊस परिषदेत तरी आवाज उठवावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.