शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन शक्य

By admin | Updated: December 11, 2014 23:48 IST

जि. प. सर्वसाधारण सभा: तक्रारींवर तातडीने निर्णय

सांगली : जत तालुक्यातील येळवी येथील आरोग्य अधिकारी प्रकाश कांबळे यांच्याविरोधात आलेल्या विविध तक्रारींची चर्चा होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असा निर्णय आज जिल्हा परिषदेतील स्थायी समिती सभेत घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी याच्याकरिता व्हिलेज पंचायत अ‍ॅक्टविषयी लवकरच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही सभेत ठरले.आज दुपारी घेण्यात आलेल्या स्थायी समिती सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्यासह सभापती व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्य अधिकारी प्रकाश कांबळे यांच्याविरोधात उध्दट वर्तन करणे, कामात अनियमितता, बाह्य रुग्ण तपासणीत हयगय करणे आदी बऱ्याच तक्रारी जि. प. प्रशासनाकडे आलेल्या होत्या. आजच्या स्थायी समितीत याप्रश्नी चर्चा झाली. प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे ठरले. पे-युनिटबाबत संस्थाचालक, संघटना प्रतिनिधी, शिक्षण सभापती यांच्या एकत्रित बैठकीचे काही दिवसातच नियोजन करण्यात येणार असल्याचेही सभेत ठरले. वैद्यकीय बिलाबाबत काही तक्रारी आल्याने त्यावर निर्णय घेण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी प्राथमिक शाळेत शिक्षकांचा पगार आॅनलाईन पध्दतीनेच देण्यात येणार आहे. याकरिता संबंधित सर्व शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. स्थायी समिती सभेत दाखल होणाऱ्या अपिलांवर लवकर निर्णय होत नसल्याची बाब काही सदस्यांनी पुढे आणली. त्यावर येणाऱ्या सर्व तक्रारी तक्रार वहीत नोंदविण्यात याव्यात तसेच त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी दिले. गौण खनिजाचे उत्पन्न जिल्हा परिषदेकडे जमा होणे गरजेचे असताना तसे होत नसल्याचा प्रकार सभेत उपस्थित झाल्यावर आजअखेर कितीजणांनी उत्पन्न जि. प. कडे जमा केलेले नाही, याविषयी स्वतंत्र अहवाल देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याचप्रमाणे संग्रामचा तालुका समन्वयक आवटीच्या वर्तवणुकीचा निषेध करीत सदस्यांनी त्यांना बडतर्फ करण्याचीही मागणी केली. (प्रतिनिधी)जतला प्राधान्य द्या : सावंतजत तालुक्यात शिक्षकांची संख्या अल्प असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा जि. प. सदस्य संजय सावंत यांनी उपस्थित केला. शिक्षणासह इतर प्रशासकीय विभागातही अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने नवीन नियुक्ती करणाऱ्यांना जतला प्राधान्य देण्याचे सभेत ठरले.