शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या चौकशीला स्थगिती

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

उच्च न्यायालयाचा निर्णय : सहकारमंत्र्यांच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया

सांगली : सहकार कायदा कलम ८८ नुसार जिल्हा बँकेच्या चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने आज, शुक्रवारी तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली. या चौकशीबाबत माजी संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे आक्षेप नोंदविला होता. त्या आक्षेपाची सुनावणी अर्धवट असल्यामुळे ती पूर्ण करण्याची सूचना न्यायाधीश पी. एम. सावंत यांनी आदेशात केली आहे. त्यामुळे माजी संचालकांना तीन महिन्यांसाठी दिलासा मिळाला आहे. तथापि, सहकारमंत्र्यांच्या निर्णयानंतर चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता काही माजी संचालकांनी व्यक्त केली.सहकार कायदा कलम ८३ अन्वये झालेल्या चौकशीत १९९६ पासूनच्या ३८ कर्ज प्रकरणांत जिल्हा बँकेला तब्बल १५७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यातील १७ प्रकरणे एकरकमी कर्जफेड योजनेची आहेत. २१ प्रकरणे कमी व विनातारण कर्जपुरवठ्याची आहेत. यामध्ये ६३ माजी संचालक व तीन माजी कार्यकारी संचालकांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यातील ११ संचालक मृत असून, त्यांच्या नातेवाइकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा कलम ८८ नुसार १५७ कोटींच्या तोट्याची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कऱ्हाडचे सहायक निबंधक संपतराव गुंजाळ चौकशी अधिकारी असून, त्यांनी त्याबाबतची अंतिम नोटीस बजावली आहे. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार होती. त्याआधीच २२ माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या प्रक्रियेला आव्हान दिले.उच्च न्यायालयातील याचिकेनुसार, जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने कलम ८३ ची चौकशी केली आहे. कारण, सहकार कायद्यानुसार लेखापरीक्षणाच्याआधारे त्या वर्षाच्या मागील पाच वर्षांच्या काळातीलच चौकशी करता येते. सध्या २००७च्या अहवालाच्या आधारे १९९६ पासूनची चौकशी केली जात आहे. याबाबत आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे माजी संचालकांनी तक्रार केल्या होत्या. त्यांच्यासमोर पाच ते सहावेळा सुनावणी झाली. मात्र, निर्णय दिला नाही. आता सहकारमंत्री किती काळात निर्णय घेणार आहेत, असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. त्यावर सरकारी वकिलांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यावर तीन महिन्यांत निर्णय घेऊ, असे पाटील यांनी सांगितले. सरकारी वकिलांनीही न्यायालयात तीन महिन्यांचा वेळ मागून घेतला. त्यामुळे पुढील सुनावणीला तीन महिने स्थगिती देण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. (प्रतिनिधी)