शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वालचंद महाविद्यालयाच्या प्रशासक मंडळाला स्थगिती,उच्च न्यायालयाचे आदेश

By admin | Updated: July 10, 2017 20:42 IST

येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला सोमवारी व्यवस्थापन मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 10 - येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला सोमवारी व्यवस्थापन मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. शासनाकडून बेकायदेशीररित्या प्रशासक
मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा व्यवस्थापन मंडळाच्यावतीने करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रशासक नियुक्तीला स्थगिती देत, १२ जुलै रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश राज्य शासनाला दिले. त्यामुळे व्यवस्थापन मंडळाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येथील सुप्रसिद्ध वालचंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावरून व्यवस्थापन मंडळ (अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल) व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्यात वाद सुरू आहे. सध्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन समितीकडे आहे. याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. गतवर्षी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून व्यवस्थापन समिती व एमटीई सोसायटीत वाद झाला होता. एमटीईचे अध्यक्ष असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व व्यवस्थापन मंडळाचे समर्थक भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यातही संघर्ष उफाळून आला होता.
त्यानंतर राज्य शासनाने या वादाच्या चौकशीसाठी घोडके समितीची नियुक्ती केली होती. शनिवारी (दि. ८) राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा अध्यादेश जारी केला. या प्रशासक मंडळात तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक, शासननियुक्त सदस्य मकरंद देशपांडे यांच्यासह एआयसीटी दिल्लीच्या प्रतिनिधींचा समावेश
करण्यात आला. सोमवारी सहसंचालक नाईक महाविद्यालयाच्या कामकाजाचा ताबा घेण्यासाठी सांगलीत आले होते. पण व्यवस्थापन मंडळाने महाविद्यालयाला सुटी जाहीर करीत, प्रशासक मंडळाला दणका दिला होता.
शासनाच्या आदेशाविरोधात व्यवस्थापन मंडळाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व रियाज छागला यांच्या खंडपीठाकडे अपील करण्यात आले. व्यवस्थापन मंडळाच्यावतीने अ‍ॅड. विजयसिंह थोरात आणि अ‍ॅड. एफ. ई. दिवत्रे यांनी बाजू मांडली. शासनाने कायद्याचे उल्लंघन करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ज्या अधिनियमाचा आधार घेतला आहे,
त्यात चौकशी करून कारवाई करण्याची तरतूद आहे. पण शासनाने व्यवस्थापन समितीला कोणतीही संधी दिलेली नाही. व्यवस्थापनाचा खुलासाही घेतला नाही. थेट प्रशासकाची नियुक्ती केली. ती बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला.
याबाबत शासनाच्यावतीने अ‍ॅड. अभिनंदन वग्याणी आणि एमटीई सोसायटीतील पुसाळकर गटाच्यावतीने सुब्रो डे यांनी बाजू मांडली. त्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. न्यायमूर्तींनी ही सुनावणी होईपर्यंत दोन दिवस प्रशासक नियुक्तीला स्थगिती दिली. यासंदर्भात पुन्हा १२ जुलैरोजी सुनावणी होणार आहे.  शासनाने नियामक मंडळाकडून कोणतीही बाजू न ऐकता राजकीय सूडबुद्धीने प्रशासक नेमला आहे. ही प्रक्रिया चुकीची असल्याने प्रशासक नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी उच्च न्यायालयात केली. शासनाला म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात व्यवस्थापन मंडळाला निश्चित न्याय मिळेल.
- रवी पुरोहित, संचालक, व्यवस्थापन मंडळ
 
राज्य शासनाने नियुक्त प्रशासक मंडळाने सोमवारी वालचंद महाविद्यालयाचे कामकाज सुरू केले. व्यवस्थापन मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती घेतली आहे. दोन दिवसांनी न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील कामकाज होईल.
- मकरंद देशपांडे, सदस्य, प्रशासक मंडळ