शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: December 16, 2014 23:35 IST

भाजपची शिष्टाई : एलबीटीला विरोध; मुख्यमंत्र्यांशी चर्चा; व्यापाऱ्यांना आश्वासन

सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी) हटवावा, एलबीटीच्या वसुलीसाठी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेली फौजदारी मागे घ्यावी आदी मागण्यांसाठी एलबीटीविरोधी कृती समितीचे सोमवारपासून सुरु असलेले बेमुदत उपोषण आज (मंगळवार) स्थगित करण्यात आले. यापुढे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली जाणार नाही, एलबीटी हटविण्यासाठी भाजप शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनाचे नेतृत्व समीर शहा यांनी केले.बेमुदत उपोषणाला चार व्यापारी बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज परभणी व कोल्हापूरचे व्यापारी सहभागी झाले होते. दरम्यान, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर माजी आ. दिनकर पाटील, शेखर इनामदार, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे आदींनी पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एलबीटी हटविण्यासाठी चर्चा केली. हा कर लवकरात लवकर हटविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्याचबरोेबर फौजदारी रोखण्यासाठीही पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही माहिती भाजपच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांना दिले व आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी भाजप नेत्यांच्याहस्ते सरबत घेऊन आंदोलन स्थगित केले. महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे उपोषण होते. विराज कोकणे, समीर शहा, अनंत चिमड, सुरेश पाटील हे बेमुदत उपोषणास बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणीचे आनंद बाळके, नरेश खैराजानी, अतुल शेळके, विक्रम रामसिंघानी व कोल्हापूरचे सदानंद कोरगावकर, संजय रामसिंघानी, संजीव शहा यांंनी आंदोलनात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांनी, एलबीटी हटविण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील, त्याचबरोबर वसुलीसाठी फौजदारी न करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. यापुढे व्यापाऱ्यांवर फौजदारी केल्यास पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विराज कोकणे, समीर शहा आदी व्यापाऱ्यांनी दिला. आयुक्तांनी कारवाई थांबवावी व केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.