शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: December 16, 2014 23:35 IST

भाजपची शिष्टाई : एलबीटीला विरोध; मुख्यमंत्र्यांशी चर्चा; व्यापाऱ्यांना आश्वासन

सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी) हटवावा, एलबीटीच्या वसुलीसाठी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेली फौजदारी मागे घ्यावी आदी मागण्यांसाठी एलबीटीविरोधी कृती समितीचे सोमवारपासून सुरु असलेले बेमुदत उपोषण आज (मंगळवार) स्थगित करण्यात आले. यापुढे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली जाणार नाही, एलबीटी हटविण्यासाठी भाजप शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास व्यापाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनाचे नेतृत्व समीर शहा यांनी केले.बेमुदत उपोषणाला चार व्यापारी बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज परभणी व कोल्हापूरचे व्यापारी सहभागी झाले होते. दरम्यान, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर माजी आ. दिनकर पाटील, शेखर इनामदार, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे आदींनी पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एलबीटी हटविण्यासाठी चर्चा केली. हा कर लवकरात लवकर हटविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्याचबरोेबर फौजदारी रोखण्यासाठीही पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही माहिती भाजपच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांना दिले व आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी भाजप नेत्यांच्याहस्ते सरबत घेऊन आंदोलन स्थगित केले. महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे उपोषण होते. विराज कोकणे, समीर शहा, अनंत चिमड, सुरेश पाटील हे बेमुदत उपोषणास बसले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणीचे आनंद बाळके, नरेश खैराजानी, अतुल शेळके, विक्रम रामसिंघानी व कोल्हापूरचे सदानंद कोरगावकर, संजय रामसिंघानी, संजीव शहा यांंनी आंदोलनात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांनी, एलबीटी हटविण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील, त्याचबरोबर वसुलीसाठी फौजदारी न करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. यापुढे व्यापाऱ्यांवर फौजदारी केल्यास पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विराज कोकणे, समीर शहा आदी व्यापाऱ्यांनी दिला. आयुक्तांनी कारवाई थांबवावी व केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.