शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सूर्यकांता अजमेरा यांचे निधन

By admin | Updated: December 1, 2015 23:41 IST

धुळे : येथील प़.खा़.भ़. सेवा मंडळाच्या अध्यक्षा व महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ़ सूर्यकांता अजमेरा (वय 65 ) यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजता निधन झाल़े.

तासगाव : सैनिक प्राणांची आहुती देतात म्हणून देशाच्या सीमा आणि आपण नागरिक सुरक्षित असतो. याची जाणीव ठेवून तरुणांनी त्यांचे सदैव स्मरण ठेवावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी वडगाव-रामपूर (ता. तासगाव) येथे मंगळवारी केले.वीर जवान शहीद उमाजी शिवाजी पवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुमनताई पाटील होत्या. घोरपडे म्हणाले, ज्या कुटुंबातील जवानांना देशासाठी वीरमरण येते, त्यांचे देशावर खूप मोठे उपकार आहेत. उमाजीच्या मृत्यूनंतरही या गावचे ग्रामस्थ त्याच्या स्मृतीची जपणूक करत आहेत. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे म्हणाले, सैनिकांच्या बलिदानामुळे आपण पाकिस्तान विरुद्धची तीनही युद्धे जिंंकली. आता त्यांच्या स्वप्नातील भारत घडवणे ही आपली जबाबदारी आहे. वडगावच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. मला विश्वास आहे की यापुढील काळातही देशाच्या संरक्षणात वडगावचे जवान मोलाची भूमिका बजावतील. सुरेशभाऊ पाटील म्हणाले, वीर जवानांचा स्मृतिदिन साजरा करण्यापेक्षा त्यांच्या स्मृती चिरंतन जिवंत रहाव्यात, यासाठी काही तरी करणे ही काळाची गरज आहे. वडगावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. आमदार सुमनताई पाटील आणि आर. आर. आबा यांचे पूर्ण कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. कमांडो अ‍ॅकॅडमीचे संजय पाटील, पाटगाव (ता. मिरज) च्या संचालिका अर्चना शिंदे, वडगावचे डी. व्ही. नाना पाटील यांनी भाषणातून शहीद उमाजी पवार यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी सकाळी आळंदी देवाची येथील विनोदभूषण अदिनाथ महाराज लाड यांचे प्रबोधनपर कीर्तन झाले. आमदार सुमनताई पाटील यांच्याहस्ते वीरमाता सुनीता पवार यांचा, तर अजितराव घोरपडे यांच्याहस्ते वीर पिता शिवाजीराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी एनएसजीच्या कमांडोसह वडगाव ग्रामस्थ, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शहीद उमाजी पवार व शहीद महादेव पाटील युथ फौंडेशन, धनंजय स्पोर्ट्स जाखापूर, ग्रामपंचायत वडगाव व ग्रामस्थ यांच्यासह कमांडो करिअर अ‍ॅकॅडमी (सोनी-पाटगाव) यांनी केले. (वार्ताहर)स्मृतिस्थळाच्या निधीसाठी प्रयत्न करणार : अनिल बाबर आमदार अनिल बाबर म्हणाले, वडगावचे एक, दोन नव्हे, तर तब्बल चार जवान देशासाठी शहीद झाले आहेत. त्यांच्या बलिदानाने गावाचे नाव देशाच्या काना-कोपऱ्यात गेले. ही भूमी वंदनीय आहे. शासनाने सैनिकांच्या स्मृतिस्थळासाठी निधीची तरतूद करावी. यासाठी स्वत: प्रयत्न करणार आहे. वडगावच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. याचे सदैव स्मरण ठेवणे आवश्यक आहे. देशाच्या संरक्षणात वडगावचे जवान यापुढेही मोलाची भूमिका बजावतील.