शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!

By admin | Updated: June 7, 2017 00:22 IST

पळपुट्यांचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टा : आपण छत्रपतींचे नाव सांगतो आणि दोन-अडीच वर्षे सत्ता नाही, तर किती पळापळ सुरू केली आहे? तत्त्व व निष्ठेने वागणाऱ्यांचीच इतिहास गौरवपूर्ण नोंद ठेवत असतो. पळपुट्यांचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतला.नेर्ले (ता. वाळवा) येथील सदातात्या पाटील मळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या आमदार जयंत पाटील स्वागत कमानीचे उद्घाटन, तसेच राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले सदाशिव पाटील यांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी़ पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी दिलीपराव पाटील, नगरसेविका सौ़ अर्चना पाटील, अतुल पाटील, प्रज्वल कदम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जनार्दन पाटील, आप्पासाहेब माने, कऱ्हाडचे जगन्नाथ मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील, जि़ प़ सदस्या सौ़ संगीता पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संचालक आनंदराव पाटील, आप्पासाहेब कदम, जयसिंग पाटील, ग्रंथपाल संघटनेचे राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, जालिंदर पाटील उपस्थित होते. के़ एस़ पाटील यांनी स्वागत केले, ए़ टी़ पाटील यांनी प्रास्ताविक केले़ विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले़ शिवराज पाटील यांनी आभार मानले.हा माझा वडीलकीचा सल्ला... विलासकाका पाटील म्हणाले की, वैचारिक पाया खचल्यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांची मुले भाजपकडे पळत सुटली आहेत़ यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी राज्यात एका बाजूला रचनात्मक काम करून लोकांचे जीवन समृध्द करतानाच, दुसऱ्या बाजूला बौध्दिक शिबिरे घेऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली़ पुन्हा एकदा बौध्दिक शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडविण्याचे काम आपणाला सुरू करावे लागेल. जयंतरावांनी हे काम हाती घ्यावे, हा माझा वडीलकीचा सल्ला आहे़