शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

भारत बंदला जिल्ह्यातील संघटनांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST

सांगली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी भारत ...

सांगली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यात धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत. सांगलीतील पुरोगामी संघटना आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सांगलीतील कष्टकऱ्यांची दौलत येथे शुक्रवारी सामाजिक संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस हमाल पंचायतचे नेते विकास मगदुम, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, ॲड. के. डी. शिंदे, कॉ. धनाजी गुरव, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, कॉ. दिगंबर कांबळे, तुळशीराम गळवे, डॉ. संजय पाटील, कॉ. नंदकुमार हत्तीकर, सदाशिव मगदुम, अमृतराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी क्रांती वीरांगना हौसाबाई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारत बंदमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग राहिला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबरोबरच, केंद्र सरकारने नवीन श्रमसंहिता आणली आहे. त्या कामगार कायद्याला देखील संयुक्त कृती समितीचा विरोध आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सांगलीतील स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला तसेच प्रत्येक तहसीलदार कार्यालयातही निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उमेश देशमुख यांनी दिली.