शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

पाठिंबा भाजपला नव्हे ‘काँग्रेस’ला

By admin | Updated: March 2, 2017 23:41 IST

जयंत पाटील : जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी मोहन शेठ-शिंदे यांच्यातील चर्चा सकारात्मक

सांगली : भाजप विचाराने आमच्या जवळचा कधीच असणार नाही. काँग्रेस मात्र विचाराने जवळचा असल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी त्यांनाच पाठिंबा देईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सांगलीत गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे बोलणी करीत आहेत. ही चर्चा सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत भाजपकडे २५, राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेसकडे १०, रयत विकास आघाडीचे तीन, शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. त्रिशंकू अवस्था असल्यामुळे सत्ता स्थापण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी लाजनतेने नाकारले असल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार नाही; पण काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास त्यांना पाठिंबा देण्यात येईल. भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष विचाराने निश्चितच आमच्या खूप जवळचा आहे. भाजप जातीयवादी असून, त्यांचे विचारही आमच्याशी जुळत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही. जिल्हा परिषदेतील सत्ता जमविण्याच्यादृष्टीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीचे १४ आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन अशी आमच्याकडे १६ सदस्य संख्या आहे. उर्वरित संख्याबळाची जुळवाजुळव काँग्रेस पक्ष करीत आहे. त्यादृष्टीने त्यांची अन्य आघाड्या आणि पक्षांच्या नेत्यांबरोबर बोलणी चालू असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)परिचारकांचा भाजपने राजीनामाच घ्यावासीमेवरील सैनिकांबद्दल भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले विधान निषेधार्हच आहे. याबाबत परिचारकांनी माफी मागून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना कमी होणार नाहीत. भाजपने परिचारक यांचा राजीनामाच घेतला पाहिजे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.पाणीटंचाईवर विधानसभेत आवाज उठविणारजिल्ह्यात पाणीटंचाई असतानाही भाजप सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. जलसंधारणाची कामे केल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याचे प्रशासन भासवत आहे. त्यामुळे जनतेचे मात्र हाल होत असून, या प्रश्नावर विधानसभेत मी स्वत: आणि आमदार सुमनताई पाटील आवाज उठविणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.