शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाठिंबा भाजपला नव्हे ‘काँग्रेस’ला

By admin | Updated: March 2, 2017 23:41 IST

जयंत पाटील : जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी मोहन शेठ-शिंदे यांच्यातील चर्चा सकारात्मक

सांगली : भाजप विचाराने आमच्या जवळचा कधीच असणार नाही. काँग्रेस मात्र विचाराने जवळचा असल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी त्यांनाच पाठिंबा देईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सांगलीत गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे बोलणी करीत आहेत. ही चर्चा सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत भाजपकडे २५, राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेसकडे १०, रयत विकास आघाडीचे तीन, शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. त्रिशंकू अवस्था असल्यामुळे सत्ता स्थापण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी लाजनतेने नाकारले असल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार नाही; पण काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास त्यांना पाठिंबा देण्यात येईल. भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष विचाराने निश्चितच आमच्या खूप जवळचा आहे. भाजप जातीयवादी असून, त्यांचे विचारही आमच्याशी जुळत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही. जिल्हा परिषदेतील सत्ता जमविण्याच्यादृष्टीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीचे १४ आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन अशी आमच्याकडे १६ सदस्य संख्या आहे. उर्वरित संख्याबळाची जुळवाजुळव काँग्रेस पक्ष करीत आहे. त्यादृष्टीने त्यांची अन्य आघाड्या आणि पक्षांच्या नेत्यांबरोबर बोलणी चालू असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)परिचारकांचा भाजपने राजीनामाच घ्यावासीमेवरील सैनिकांबद्दल भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले विधान निषेधार्हच आहे. याबाबत परिचारकांनी माफी मागून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना कमी होणार नाहीत. भाजपने परिचारक यांचा राजीनामाच घेतला पाहिजे, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.पाणीटंचाईवर विधानसभेत आवाज उठविणारजिल्ह्यात पाणीटंचाई असतानाही भाजप सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. जलसंधारणाची कामे केल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याचे प्रशासन भासवत आहे. त्यामुळे जनतेचे मात्र हाल होत असून, या प्रश्नावर विधानसभेत मी स्वत: आणि आमदार सुमनताई पाटील आवाज उठविणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.