शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

सर्वसामान्यांचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:24 IST

‘घार उडे आकाशी...पण चित्त तिचे पिलापाशी...’ या उक्तीप्रमाणे नाना पुण्यात स्थायिक असूनही त्यांनी कधीही गावाशी नाळ तुटू दिली नाही. ...

‘घार उडे आकाशी...पण चित्त तिचे पिलापाशी...’ या उक्तीप्रमाणे नाना पुण्यात स्थायिक असूनही त्यांनी कधीही गावाशी नाळ तुटू दिली नाही. कामाची ओढ त्यांना सतत गावाच्या सर्वांगिण विकासासाठी हाक देत राहिली. त्यामुळे गावकऱ्यांनीही नानांवर भरभरुन प्रेम केले. गावातील सर्व सत्ताकेंद्रे नानांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहेत. वडील पंढरीनाथ पाटील हे पंचक्रोशीतील आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वत:ची गावातील मोक्याच्या ठिकाणची जागा सोसायटीला दिली. उच्चशिक्षणासाठी नाना पुण्यात गेले. त्यांनी विद्यार्थी संघटना व चळवळीमध्ये सहभाग घेतला. पुण्याच्या धोंडीमामा साठे कॉलेजच्या सचिवपदी नानांनी काम केले. त्यांच्या आंदोलनामुळे देशातील पहिल्या होमिओपॅथिक पदवी कॉलेजला मान्यता मिळाली. याच कॉलेजला पुणे विद्यापीठात समावेशासाठी नानांनी संघर्ष केला.

वडील पंढरीनाथअण्णांच्या निधनानंतर गावाची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. राजकारणात काम करताना आपले सामाजिक भान त्यांनी कधीही ढळू दिले नाही. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. २००४मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने त्यांनी तासगाव विधानसभेची निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्याबरोबर काम करत त्यांनी आपल्या कतृर्त्वाचा आलेख उंचावला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक न भूतो न भविष्यती असा संघर्ष करत कोणावर अवलंबून न राहता एकतर्फी जिंकली. जिल्हा बँकेत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत नाना नेहमीच हळवे राहिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, सोसायटीकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक असो, सामान्य शेतकऱ्यांचे कर्ज अडणार नाही, यासाठी नाना नेहमीच आग्रही राहिले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत संचालक मंडळात हिरिरीने मांडण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. बँकेचा कर्जपुरवठा हा जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

गावोगावच्या आर्थिक उलाढालीचा कणा असणाऱ्या विकास सोसायटी या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आत्मा आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्टया दुर्बल झालेल्या विकास सोसायट्यांच्या सबलीकरणावर जोर दिला पाहिजे, अशी भूमिका प्रतापनानांनी सातत्याने बँकेच्या संचालक मंडळासमोर मांडली. डोर्लीसारखी बंद पडलेली विकास सोसायटी पुनर्जीवित करत शेतकऱ्यांचा पतपुरवठा पूर्ववत केला. जुन्या इमारतीमधून कारभार हाकणाऱ्या विकास सोसायट्यांना इमारत बांधकाम करण्यासाठी बिनव्याजी वीस लाख रुपये संचालक मंडळ व प्रशासनाच्या सहकार्याने मंजूर करून दिले.

आरफळ, ताकारी, टेंभूच्या पाण्यासाठी नानांनी जोरदार संघर्ष केला. गावकऱ्यांनी एकतर्फी नानांच्या हाती सत्ता दिली. ग्रामपंचायत इमारत, अंतर्गत पाईपलाईन, रस्ते व गटारे बांधून गावाचा कायापालट केला. शिरगावला महाराष्ट्रातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत होण्याचा मान प्रतापनानांनी मिळवून दिला. गावात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे पहिले एटीएम सुरु केले. वडिलांनी जागा दिलेल्या सोसायटीची सुसज्ज इमारत उभी केली. नुसती इमारत नव्हे तर ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेची मिनी शाखाच तिथे सुरू केली.

नेहमी स्पष्ट बोलणार पण खरे बोलणार, गावाच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या डॉ. प्रतापनाना पाटील यांचा आज वाढदिवस आहे. नानांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!