शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस : दराचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:39 IST

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत.

ठळक मुद्देदर्जानुसार किलोला ५0 ते ७0 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता; यंदा आशादायक चित्र

गजानन पाटील ।

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत. दुष्काळी भागात विनाखर्च व रोगाची शक्यता सर्वात कमी असलेल्या या चिंचेला यंदा पावसाचे पाणी योग्यवेळी मिळाल्याने अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येणाºया चिंचा छोट्या-मोठ्या उत्पादकांना चांगला ‘उन्हाळी बोनस’ देतील, अशी अपेक्षा उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

 भारतात सर्वत्र आढळणाºया चिंचांची लागवड महाराष्टÑातही सर्वत्र पाहावयास मिळते. तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मागील काही वर्षांपासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करू लागले आहेत. त्यामुळे लहान व मोठे चिंचेचे उत्पादक या भागात आहेत. गतवर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत पावसाने समाधानकारक दमदार हजेरी लावली. जून, जुलै महिन्यांत चिंचेला फुलोरा येतो व त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते. त्यामुळे वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यानेच यंदा बºयाच झाडांना गतवर्षीपेक्षा चिंचेची लागण अधिक झाली आहे. मोठ्या प्रमाणावर चिंचा झाडांना लगडल्या असून, त्याचा बहर दिसून येत आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत या चिंचा काढणीच्यावेळी उत्पादनात वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी चिंचेस विक्रमी दर मिळाला होता. यंदा चिंच उत्पादकांना ५० ते ७० रुपये किलोपर्यंत दर्जानुसार दर मिळाल्यास ऐन उन्हाळ्यात चिंचेच्या दराचा उन्हाळी बोनस मिळणार आहे.इतिहासातील चिंच लागवडम्हैसूर संस्थानात चिंच लागवडीत प्राधान्य दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर संस्थानात ३०० वर्षांपूर्वी सुमारे ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. त्याच्या उत्पादनाची लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आहे. 

बहुगुणी चिंच...चिंच चवीला आंबट असली तरी ‘भारतीय खजूर’ म्हणून संबोधण्यात येणारी चिंच सार, चटणी, कोळ, अर्क, गर पावडर, पन्हे, सरबत, औषधे याकरिता उपयोगी आहे. जेवणामध्ये चिंचेचा सर्रास वापर केला जातो. तसेच चिंचेचे लाकूड मऊ व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, शेती कामाची औजारे बनविण्यासाठी या लाकडाला मोठी मागणी आहे. सध्या या लाकडाला २६५ रुपये घनफूट भाव मिळत आहे.चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्वचिंचेच्या १०० ग्रॅम गरामध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, ‘क’ जीवनसत्त्व - ३ गॅ्रम, कॅल्शियम ०.१७ टक्के इतके प्रमाण असते. तसेच आम्लपित्त, पोटाचे विकार, निद्रानाश यासारख्या विविध विकारांवरही चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे, तर चिंचोक्यांचा स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत वापर होतो. मुंबई, सोलापूर, मालेगाव, बार्शी येथे चिंचोक्यांपासून खळ निर्मितीचे कारखाने आहेत.