शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस : दराचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:39 IST

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत.

ठळक मुद्देदर्जानुसार किलोला ५0 ते ७0 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता; यंदा आशादायक चित्र

गजानन पाटील ।

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत. दुष्काळी भागात विनाखर्च व रोगाची शक्यता सर्वात कमी असलेल्या या चिंचेला यंदा पावसाचे पाणी योग्यवेळी मिळाल्याने अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येणाºया चिंचा छोट्या-मोठ्या उत्पादकांना चांगला ‘उन्हाळी बोनस’ देतील, अशी अपेक्षा उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

 भारतात सर्वत्र आढळणाºया चिंचांची लागवड महाराष्टÑातही सर्वत्र पाहावयास मिळते. तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मागील काही वर्षांपासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करू लागले आहेत. त्यामुळे लहान व मोठे चिंचेचे उत्पादक या भागात आहेत. गतवर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत पावसाने समाधानकारक दमदार हजेरी लावली. जून, जुलै महिन्यांत चिंचेला फुलोरा येतो व त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते. त्यामुळे वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यानेच यंदा बºयाच झाडांना गतवर्षीपेक्षा चिंचेची लागण अधिक झाली आहे. मोठ्या प्रमाणावर चिंचा झाडांना लगडल्या असून, त्याचा बहर दिसून येत आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत या चिंचा काढणीच्यावेळी उत्पादनात वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी चिंचेस विक्रमी दर मिळाला होता. यंदा चिंच उत्पादकांना ५० ते ७० रुपये किलोपर्यंत दर्जानुसार दर मिळाल्यास ऐन उन्हाळ्यात चिंचेच्या दराचा उन्हाळी बोनस मिळणार आहे.इतिहासातील चिंच लागवडम्हैसूर संस्थानात चिंच लागवडीत प्राधान्य दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर संस्थानात ३०० वर्षांपूर्वी सुमारे ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. त्याच्या उत्पादनाची लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आहे. 

बहुगुणी चिंच...चिंच चवीला आंबट असली तरी ‘भारतीय खजूर’ म्हणून संबोधण्यात येणारी चिंच सार, चटणी, कोळ, अर्क, गर पावडर, पन्हे, सरबत, औषधे याकरिता उपयोगी आहे. जेवणामध्ये चिंचेचा सर्रास वापर केला जातो. तसेच चिंचेचे लाकूड मऊ व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, शेती कामाची औजारे बनविण्यासाठी या लाकडाला मोठी मागणी आहे. सध्या या लाकडाला २६५ रुपये घनफूट भाव मिळत आहे.चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्वचिंचेच्या १०० ग्रॅम गरामध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, ‘क’ जीवनसत्त्व - ३ गॅ्रम, कॅल्शियम ०.१७ टक्के इतके प्रमाण असते. तसेच आम्लपित्त, पोटाचे विकार, निद्रानाश यासारख्या विविध विकारांवरही चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे, तर चिंचोक्यांचा स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत वापर होतो. मुंबई, सोलापूर, मालेगाव, बार्शी येथे चिंचोक्यांपासून खळ निर्मितीचे कारखाने आहेत.