शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

चिमुरडीसह मातेची विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 01:22 IST

जत तालुक्यातील अंतराळ येथील घटना

जत : तालुक्यातील अंतराळ येथील रेणुका ऊर्फ अर्चना राहुल बुरुटे (वय १९) यांनी स्वत:च्या प्रांजली (१० महिने) या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी बाळासाहेब शंकर बुरुटे (रा. शेगाव, ता. जत) यांनी जत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रेणुका व राहुल बुरुटे यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. रेणुका यांचे माहेर रेड्डे (ता. मंगळवेढा) आहे. त्यांना दहा महिन्यांची एक मुलगी असून, राहुल शेतमजूर आहेत. अंतराळपासून सुमारे दोन किलोमीटरवर आवंढी रस्त्यावरील बुरुटे मळ्यात रेणुका, पती राहुल, सासू विमल, सासरा मारुती, नणंद वैशाली, दीर विनोद व जाऊ असे एकत्रित आठजणांचे कुटुंब राहते. रेणुका व राहुल या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सतत वाद-विवाद होत असल्यामुळे रेणुका यांचे वडील यशवंत मारुती कांबळे रविवारी अंतराळ येथे आले होते. दोघांना समजावून सांगून ते सोमवारी निघून गेले होते. रेणुका राहत असलेल्या घरापासून जवळच शिवाजी गेनू बुरुटे यांची विहीर आहे. रेणुका बुधवारी सकाळी मुलीसह घरातील कोणालाही न सांगता विहिरीवर गेल्या. तेथून त्यांनी पती राहुल यांना दूरध्वनी करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. वडिलांनाही दूरध्वनी करून लवकर येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी चप्पल विहिरीच्या काठावर सोडून त्यावर मोबाईल ठेवला. डोक्याला बांधलेला स्कार्फ सोडून त्यांनी प्रांजलीला त्याच स्कार्फने स्वत:च्या पोटाला बांधून घेऊन विहिरीत उडी मारली. राहुल डेअरीत दूध घालण्यासाठी शेगाव येथे गेले होते. दूरध्वनी आल्यानंतर ते तत्काळ विहिरीकडे धावले. तेथील नागरिकांना बोलावून घेऊन त्यांनी रेणुका व प्रांजली यांना बाहेर काढले; पण त्यापूर्वीच दोघी मायलेकींचा मृत्यू झाला होता.दरम्यान, रेणुका यांनी आत्महत्या केली नसून, सासू, सासरा, दीर, पती, जाऊ व नणंद यांनी संगनमताने खून करून त्यांना विहिरीत ढकलून दिले आहे. सासरकडून सतत मारहाण करून तिचा पैशासाठी मानसिक छळ केला जात होता, अशी तक्रार रेणुका यांचे वडील यशवंत कांबळे व आई रुक्मिणी कांबळे यांनी जत पोलिसांत केली आहे; परंतु या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील तपास पोलीस हवालदार किरण कांबळे व दिग्विजय कराळे करीत आहेत. (वार्ताहर)