शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

खून प्रकरणातील सरपंचाच्या भाच्यावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

कवठेमहांकाळ : शहरातील जत रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अमर जयराम आटपाडकर (वय २८, रा. पिंपळवाडी) याच्यावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा ...

कवठेमहांकाळ : शहरातील जत रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अमर जयराम आटपाडकर (वय २८, रा. पिंपळवाडी) याच्यावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाला. हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित रमेश खोत याचा तो भाचा आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊला घडली. या जीवघेण्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आटपाडकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मिरजेत उपचार सुरू आहेत.

कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती युवराज पाटील, अनंत पारे यांना ताब्यात घेतले आहे. अद्याप दोघेजण फरार आहेत.

बोरगावमधील हाणामारी प्रकरणापाठोपाठ शनिवारी कवठेमहांकाळ तालुक्यात पुन्हा जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अमर आटपाडकर पिंपळवाडीचा माजी सरपंच रमेश खोत याचा भाचा आहे. रमेश खोत हा हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आहे. सध्या तो मोक्काच्या कारवाईखाली कारागृहात आहे. अमर हा खोत याचा भाचा असल्याने युवराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे त्याच्याशीही वैमनस्य आहे.

अमरचे येथील थबडेवाडी चौकात ऑनलाईन लॉटरीचे दुकान आहे. सकाळी ते उघडण्यासाठी तो आला होता. दुकान उघडण्याआधी तो शेजारील हॉटेलजवळ उभा होता. तेथे दुचाकीवरून चार अज्ञात हल्लेखोर आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी हातातील कुकरीने अमरवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर सपासप वार केले. झटापटीत अमर खाली पडला. तिथे असणारे हॉटेलमालक विजय माने यांनी हल्लेखोरांना अडवले. त्यानंतर तिथे शेजारचे दुकानदार पळत आले. त्यांना पाहून हल्लेखोर गाडी तिथेच टाकून पसार झाले. अमर याला मिरज येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती युवराज पाटील, अनंत पारे या दोघांना ताब्यात घेतले आहे. अद्याप दोघे फरार आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे.

चौकट

टोळीयुद्ध भडकणार

गेले वर्ष-दीड वर्ष शांत असणारा कवठेमहांकाळ तालुका पुन्हा सुडाच्या भावनेने पेटला आहे. तालुक्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या आठवड्यात बोरगावच्या हाणामारी प्रकरणानंतर लगेच हा हल्ला झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.