शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

भिलवडी : एकरकमी एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक रोखणार असल्याची माहिती ...

भिलवडी : एकरकमी एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक रोखणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली. आज, शुक्रवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी प्रतिनिधी या कारखान्यास ऊस घेऊन जाणारी वाहने रोखणार आहेत.

ते म्हणाले, उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. सोनहिरा सहकारी व उदगीर साखर कारखाना या दोनच साखर कारखान्यांनी एकरकमी एफ.आर.पी.नुसार दर दिला आहे. हे दोन कारखाने वगळता इतर कोणत्याही कारखान्याने अद्याप एकरकमी एफ.आर.पी.ची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा केलेली नाही. नोव्हेंबरमध्ये कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. पहिली बैठक चर्चेविना निष्फळ ठरली. परंतु १८ तारखेच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा मान्य केला. परंतु कारखाना सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही इतर कोणत्याच कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनाला किंवा संचालक मंडळांना फोनवरून किंवा समक्ष भेटून उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा असे सांगूनदेखील हे कारखानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. केंद्र शासनानेसुद्धा एफआरपीसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये गाळप झालेल्या उसाची बिले एकरकमी एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून संपूर्ण जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखणार आहे.