शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उसाची तीन टप्प्यांतील एफआरपी मान्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST

इस्लामपूर : नीती आयोगाने सुचवलेली तीन टप्प्यांतील उसाची एफआरपी कदापि मान्य केली जाणार नाही. शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ती ...

इस्लामपूर : नीती आयोगाने सुचवलेली तीन टप्प्यांतील उसाची एफआरपी कदापि मान्य केली जाणार नाही. शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ती एकरकमी मिळाली पाहिजे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी मंगळवारी केली. साखर नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यानी सांगितले.

बळीराजा, अंकुश आणि जय शिवराय या तीन शेतकरी संघटनांनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य सरकारने केलेली ६०:२०:२० अशी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची सूचना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. ती १४ दिवसांत एकरकमी मिळाल्यास शेतकरी विकास सोसायटी, बँक यांचे कर्ज फेडू शकतात. त्यांना व्याजाचा भुर्दंड बसणार नाही.

ते म्हणाले की, तोष्णीवाल समितीने जेवढे अंतर आहे, तेवढीच तोडणी वाहतूक धरण्याची शिफारस केली होती. कारखानदारांनी मात्र सरासरी अंतर काढून हा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला आहे. कायद्यात सुधारणा करून प्रत्येक कारखान्याचे सरकारी लेखापरीक्षकांकडून व्यवहार तपासणी करणे बंधनकारक करायला हवे. या विषयावर आम्ही साखर नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करत आहोत.

यावेळी सदाशिव कुलकर्णी, तात्यासाहेब कोळी (कुंभोज), उत्तम पाटील, गब्बर पाटील (लाटवडे) उपस्थित होते.