शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

उसाची तीन टप्प्यांतील एफआरपी मान्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST

इस्लामपूर : नीती आयोगाने सुचवलेली तीन टप्प्यांतील उसाची एफआरपी कदापि मान्य केली जाणार नाही. शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ती ...

इस्लामपूर : नीती आयोगाने सुचवलेली तीन टप्प्यांतील उसाची एफआरपी कदापि मान्य केली जाणार नाही. शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ती एकरकमी मिळाली पाहिजे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी मंगळवारी केली. साखर नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यानी सांगितले.

बळीराजा, अंकुश आणि जय शिवराय या तीन शेतकरी संघटनांनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य सरकारने केलेली ६०:२०:२० अशी तीन टप्प्यांत एफआरपी देण्याची सूचना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. ती १४ दिवसांत एकरकमी मिळाल्यास शेतकरी विकास सोसायटी, बँक यांचे कर्ज फेडू शकतात. त्यांना व्याजाचा भुर्दंड बसणार नाही.

ते म्हणाले की, तोष्णीवाल समितीने जेवढे अंतर आहे, तेवढीच तोडणी वाहतूक धरण्याची शिफारस केली होती. कारखानदारांनी मात्र सरासरी अंतर काढून हा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला आहे. कायद्यात सुधारणा करून प्रत्येक कारखान्याचे सरकारी लेखापरीक्षकांकडून व्यवहार तपासणी करणे बंधनकारक करायला हवे. या विषयावर आम्ही साखर नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करत आहोत.

यावेळी सदाशिव कुलकर्णी, तात्यासाहेब कोळी (कुंभोज), उत्तम पाटील, गब्बर पाटील (लाटवडे) उपस्थित होते.