शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या कलगीतुऱ्यात ऊस उत्पादक वाऱ्यावर

By admin | Updated: April 1, 2015 00:01 IST

दराचा प्रश्न कायम : जयंत पाटील, राजू शेट्टी, रघुनाथदादांचे आरोप-प्रत्यारोप

अशोक पाटील-इस्लामपूर -राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यात सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरून कलगीतुरा रंगला आहे. त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा भर टाकत असून शेट्टी आणि जयंत पाटील नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे नेते आरोप-प्रत्यारोपातच गुरफटलेले आहेत. त्यांनी ऊस उत्पादकांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला २५०० ते २६०० रुपये दिल्याचे श्रेय खासदार राजू शेट्टी लाटत आहेत, तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचाही पल्ला गाठला नाही, याचे खापर आमदार जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्यावर फोडले आहे. तथापि जयंत पाटील मात्र स्वत:च्या कारखान्याच्या सभासदांना कोल्हापूरइतका दर देऊ शकलेले नाहीत, यावरून शेट्टी आणि त्यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गेले काही दिवस दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.दुसरीकडे शेट्टी आणि जयंत पाटील हे ढोंगी नेते असून ऊस उत्पादकांच्या पायात साप सोडण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. ऊस दराबाबत दोघेही नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उसाला दर मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सर्वच सक्षम साखरसम्राटांनी पाने पुसली आहेत. ऊस उत्पादकांना राजू शेट्टी फक्त आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या जनमताचा आलेख ढासळत चालला आहे. त्याचा फायदा जयंत पाटील उठवत असले तरी, त्यांनीही स्वत:च्या कारखान्याचा दर कमी देऊन सभासदांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही सभासदांनी, जो कारखाना जादा दर देईल, तिकडे ऊस घालणे पसंत केले आहे.या दोन्ही नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. परिणामी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा कमी दर मिळाल्याने या दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर विश्वास ठेवण्यास ऊस उत्पादक तयार नाहीत. राजू शेट्टी आणि जयंत पाटील हे संधिसाधू नेते आहेत. ऊस उत्पादकांना लुबाडणे हाच त्यांचा धंदा आहे. साखरसम्राटांना एफआरपीप्रमाणे दर देणे गेल्या १० वर्षांपासून जमले नाही. गत हंगामात राजू शेट्टी यांनी एफआरपी २६४० असताना २२०० रुपयांवर तडजोड करून ऊस उत्पादकांना मातीत घातले आहे. ऊस दराचे श्रेय लाटून लोकसभेला निवडून येण्याचा त्यांचा धंदा आहे, तर विधानसभेला जयंत पाटील यांना कसलाही विरोध न करता शेट्टी जुजबी प्रचार करतात. यामुळे या दोघांमध्ये नुरा कुस्ती होत असते.- रघुनाथ पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.