शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नेत्यांच्या कलगीतुऱ्यात ऊस उत्पादक वाऱ्यावर

By admin | Updated: April 1, 2015 00:01 IST

दराचा प्रश्न कायम : जयंत पाटील, राजू शेट्टी, रघुनाथदादांचे आरोप-प्रत्यारोप

अशोक पाटील-इस्लामपूर -राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यात सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरून कलगीतुरा रंगला आहे. त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा भर टाकत असून शेट्टी आणि जयंत पाटील नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे नेते आरोप-प्रत्यारोपातच गुरफटलेले आहेत. त्यांनी ऊस उत्पादकांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला २५०० ते २६०० रुपये दिल्याचे श्रेय खासदार राजू शेट्टी लाटत आहेत, तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचाही पल्ला गाठला नाही, याचे खापर आमदार जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्यावर फोडले आहे. तथापि जयंत पाटील मात्र स्वत:च्या कारखान्याच्या सभासदांना कोल्हापूरइतका दर देऊ शकलेले नाहीत, यावरून शेट्टी आणि त्यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गेले काही दिवस दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.दुसरीकडे शेट्टी आणि जयंत पाटील हे ढोंगी नेते असून ऊस उत्पादकांच्या पायात साप सोडण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. ऊस दराबाबत दोघेही नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उसाला दर मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सर्वच सक्षम साखरसम्राटांनी पाने पुसली आहेत. ऊस उत्पादकांना राजू शेट्टी फक्त आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या जनमताचा आलेख ढासळत चालला आहे. त्याचा फायदा जयंत पाटील उठवत असले तरी, त्यांनीही स्वत:च्या कारखान्याचा दर कमी देऊन सभासदांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही सभासदांनी, जो कारखाना जादा दर देईल, तिकडे ऊस घालणे पसंत केले आहे.या दोन्ही नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. परिणामी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा कमी दर मिळाल्याने या दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर विश्वास ठेवण्यास ऊस उत्पादक तयार नाहीत. राजू शेट्टी आणि जयंत पाटील हे संधिसाधू नेते आहेत. ऊस उत्पादकांना लुबाडणे हाच त्यांचा धंदा आहे. साखरसम्राटांना एफआरपीप्रमाणे दर देणे गेल्या १० वर्षांपासून जमले नाही. गत हंगामात राजू शेट्टी यांनी एफआरपी २६४० असताना २२०० रुपयांवर तडजोड करून ऊस उत्पादकांना मातीत घातले आहे. ऊस दराचे श्रेय लाटून लोकसभेला निवडून येण्याचा त्यांचा धंदा आहे, तर विधानसभेला जयंत पाटील यांना कसलाही विरोध न करता शेट्टी जुजबी प्रचार करतात. यामुळे या दोघांमध्ये नुरा कुस्ती होत असते.- रघुनाथ पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.