शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नेत्यांच्या कलगीतुऱ्यात ऊस उत्पादक वाऱ्यावर

By admin | Updated: April 1, 2015 00:01 IST

दराचा प्रश्न कायम : जयंत पाटील, राजू शेट्टी, रघुनाथदादांचे आरोप-प्रत्यारोप

अशोक पाटील-इस्लामपूर -राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यात सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरून कलगीतुरा रंगला आहे. त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा भर टाकत असून शेट्टी आणि जयंत पाटील नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे नेते आरोप-प्रत्यारोपातच गुरफटलेले आहेत. त्यांनी ऊस उत्पादकांना जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला २५०० ते २६०० रुपये दिल्याचे श्रेय खासदार राजू शेट्टी लाटत आहेत, तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचाही पल्ला गाठला नाही, याचे खापर आमदार जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्यावर फोडले आहे. तथापि जयंत पाटील मात्र स्वत:च्या कारखान्याच्या सभासदांना कोल्हापूरइतका दर देऊ शकलेले नाहीत, यावरून शेट्टी आणि त्यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गेले काही दिवस दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.दुसरीकडे शेट्टी आणि जयंत पाटील हे ढोंगी नेते असून ऊस उत्पादकांच्या पायात साप सोडण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. ऊस दराबाबत दोघेही नुरा कुस्ती खेळत असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उसाला दर मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सर्वच सक्षम साखरसम्राटांनी पाने पुसली आहेत. ऊस उत्पादकांना राजू शेट्टी फक्त आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या जनमताचा आलेख ढासळत चालला आहे. त्याचा फायदा जयंत पाटील उठवत असले तरी, त्यांनीही स्वत:च्या कारखान्याचा दर कमी देऊन सभासदांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही सभासदांनी, जो कारखाना जादा दर देईल, तिकडे ऊस घालणे पसंत केले आहे.या दोन्ही नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. परिणामी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा कमी दर मिळाल्याने या दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर विश्वास ठेवण्यास ऊस उत्पादक तयार नाहीत. राजू शेट्टी आणि जयंत पाटील हे संधिसाधू नेते आहेत. ऊस उत्पादकांना लुबाडणे हाच त्यांचा धंदा आहे. साखरसम्राटांना एफआरपीप्रमाणे दर देणे गेल्या १० वर्षांपासून जमले नाही. गत हंगामात राजू शेट्टी यांनी एफआरपी २६४० असताना २२०० रुपयांवर तडजोड करून ऊस उत्पादकांना मातीत घातले आहे. ऊस दराचे श्रेय लाटून लोकसभेला निवडून येण्याचा त्यांचा धंदा आहे, तर विधानसभेला जयंत पाटील यांना कसलाही विरोध न करता शेट्टी जुजबी प्रचार करतात. यामुळे या दोघांमध्ये नुरा कुस्ती होत असते.- रघुनाथ पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना.