शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

साखर कारखानदारांच्या काटामारीला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा ...

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा ऊस उत्पादकांचा आरोप आहे. कारखान्याच्या आणि बाहेरच्या काट्यावरील वजनात दीड-दोन टनाचा फरक पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत.सध्या ऊस दरापेक्षा काटामारी हाच चर्चेचा विषय आहे. साखर कारखान्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन-काटे बसविलेले असूनही त्यात मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. शेतकरी संघटनाही ऊस दराच्या आंदोलनात यशस्वी होतात, पण काटामारी रोखण्यात मात्र अपयशी ठरतात. संघटनांनी जाब विचारल्यावर, कारखानदार काटामारीचा आरोप फेटाळून लावत आहेत.प्रत्येक ट्रॅक्टरमधून सरासरी १५ ते २० टन, तर ट्रकमधून १२ ते १५ टन उसाची वाहतूक केली जात आहे. अशा ट्रक अथवा ट्रॅक्टरमागे दीड ते दोन टन काटामारी केली जाते. या साखर कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांचा फारसा अंकुश नसल्याचाही आरोप आहे. तपासणीपूर्वी अधिकाºयांकडून वजन-काट्याच्या तपासणीची कल्पना कारखानदारांना दिल्यामुळे काटामारीची यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे अधिकारी तपासणीनंतर लगेच कारखान्याचा वजन-काटा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देतात.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वजन-काट्यांची एकाचवेळी अचानक तपासणी केल्यास गोलमाल उजेडात येऊ शकते.शेतकरी स्वत: वजन करायला जात नाही; पण शेतकरी आणि ऊस तोडणारे मजूर नजरेने वाहनामध्ये ऊस किती टन आहे, हे ओळखतात. काही शेतकºयांनी अन्य काट्यावर वजन करून ऊस नेला तर तो ऊस कारखानदार स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आहेत.खासगी वजन काटे ‘मॅनेज’खासगी वजनकाटे चालविणाºयांना साखर कारखान्यांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे एखाद्या शेतकºयाने तेथे वजन केल्यास ती माहिती साखर कारखान्याला त्वरित कळविली जाते. यावर पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून ग्रामपंचायतींना वजन काटे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र साखर कारखान्यांचा दबाव असणाºया ग्रामपंचायती अशाप्रकारचा निधी घेण्यास तयार होत नाहीत.वाहन मालक व मजुरांनाही फटकाऊसतोडणी मजुराला मजुरी वजनावर मिळते. उसाची वाहतूक करणाºयांना भाडे वजनावर मिळते. त्यामुळे काटा मारल्यानंतर शेतकºयांचे तर नुकसान होतेच, पण ऊस तोडणाºया मजुरांचे आणि वाहतूक करणाºया वाहनमालकांचेही नुकसान होते.‘कारखाने बंद पाडू’काही साखर कारखाने वजनात काटामारी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लवकरच वैधमापन विभागाकडे लेखी तक्रार करू. त्यांनी कारवाई केली तर ठीक़, नाही तर कारखान्यांचे हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिला आहे.