शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांच्या काटामारीला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा ...

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा ऊस उत्पादकांचा आरोप आहे. कारखान्याच्या आणि बाहेरच्या काट्यावरील वजनात दीड-दोन टनाचा फरक पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत.सध्या ऊस दरापेक्षा काटामारी हाच चर्चेचा विषय आहे. साखर कारखान्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन-काटे बसविलेले असूनही त्यात मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. शेतकरी संघटनाही ऊस दराच्या आंदोलनात यशस्वी होतात, पण काटामारी रोखण्यात मात्र अपयशी ठरतात. संघटनांनी जाब विचारल्यावर, कारखानदार काटामारीचा आरोप फेटाळून लावत आहेत.प्रत्येक ट्रॅक्टरमधून सरासरी १५ ते २० टन, तर ट्रकमधून १२ ते १५ टन उसाची वाहतूक केली जात आहे. अशा ट्रक अथवा ट्रॅक्टरमागे दीड ते दोन टन काटामारी केली जाते. या साखर कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांचा फारसा अंकुश नसल्याचाही आरोप आहे. तपासणीपूर्वी अधिकाºयांकडून वजन-काट्याच्या तपासणीची कल्पना कारखानदारांना दिल्यामुळे काटामारीची यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे अधिकारी तपासणीनंतर लगेच कारखान्याचा वजन-काटा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देतात.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वजन-काट्यांची एकाचवेळी अचानक तपासणी केल्यास गोलमाल उजेडात येऊ शकते.शेतकरी स्वत: वजन करायला जात नाही; पण शेतकरी आणि ऊस तोडणारे मजूर नजरेने वाहनामध्ये ऊस किती टन आहे, हे ओळखतात. काही शेतकºयांनी अन्य काट्यावर वजन करून ऊस नेला तर तो ऊस कारखानदार स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आहेत.खासगी वजन काटे ‘मॅनेज’खासगी वजनकाटे चालविणाºयांना साखर कारखान्यांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे एखाद्या शेतकºयाने तेथे वजन केल्यास ती माहिती साखर कारखान्याला त्वरित कळविली जाते. यावर पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून ग्रामपंचायतींना वजन काटे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र साखर कारखान्यांचा दबाव असणाºया ग्रामपंचायती अशाप्रकारचा निधी घेण्यास तयार होत नाहीत.वाहन मालक व मजुरांनाही फटकाऊसतोडणी मजुराला मजुरी वजनावर मिळते. उसाची वाहतूक करणाºयांना भाडे वजनावर मिळते. त्यामुळे काटा मारल्यानंतर शेतकºयांचे तर नुकसान होतेच, पण ऊस तोडणाºया मजुरांचे आणि वाहतूक करणाºया वाहनमालकांचेही नुकसान होते.‘कारखाने बंद पाडू’काही साखर कारखाने वजनात काटामारी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लवकरच वैधमापन विभागाकडे लेखी तक्रार करू. त्यांनी कारवाई केली तर ठीक़, नाही तर कारखान्यांचे हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिला आहे.