शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

साखर कारखानदारांच्या काटामारीला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा ...

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा ऊस उत्पादकांचा आरोप आहे. कारखान्याच्या आणि बाहेरच्या काट्यावरील वजनात दीड-दोन टनाचा फरक पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत.सध्या ऊस दरापेक्षा काटामारी हाच चर्चेचा विषय आहे. साखर कारखान्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन-काटे बसविलेले असूनही त्यात मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. शेतकरी संघटनाही ऊस दराच्या आंदोलनात यशस्वी होतात, पण काटामारी रोखण्यात मात्र अपयशी ठरतात. संघटनांनी जाब विचारल्यावर, कारखानदार काटामारीचा आरोप फेटाळून लावत आहेत.प्रत्येक ट्रॅक्टरमधून सरासरी १५ ते २० टन, तर ट्रकमधून १२ ते १५ टन उसाची वाहतूक केली जात आहे. अशा ट्रक अथवा ट्रॅक्टरमागे दीड ते दोन टन काटामारी केली जाते. या साखर कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांचा फारसा अंकुश नसल्याचाही आरोप आहे. तपासणीपूर्वी अधिकाºयांकडून वजन-काट्याच्या तपासणीची कल्पना कारखानदारांना दिल्यामुळे काटामारीची यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे अधिकारी तपासणीनंतर लगेच कारखान्याचा वजन-काटा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देतात.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वजन-काट्यांची एकाचवेळी अचानक तपासणी केल्यास गोलमाल उजेडात येऊ शकते.शेतकरी स्वत: वजन करायला जात नाही; पण शेतकरी आणि ऊस तोडणारे मजूर नजरेने वाहनामध्ये ऊस किती टन आहे, हे ओळखतात. काही शेतकºयांनी अन्य काट्यावर वजन करून ऊस नेला तर तो ऊस कारखानदार स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आहेत.खासगी वजन काटे ‘मॅनेज’खासगी वजनकाटे चालविणाºयांना साखर कारखान्यांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे एखाद्या शेतकºयाने तेथे वजन केल्यास ती माहिती साखर कारखान्याला त्वरित कळविली जाते. यावर पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून ग्रामपंचायतींना वजन काटे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र साखर कारखान्यांचा दबाव असणाºया ग्रामपंचायती अशाप्रकारचा निधी घेण्यास तयार होत नाहीत.वाहन मालक व मजुरांनाही फटकाऊसतोडणी मजुराला मजुरी वजनावर मिळते. उसाची वाहतूक करणाºयांना भाडे वजनावर मिळते. त्यामुळे काटा मारल्यानंतर शेतकºयांचे तर नुकसान होतेच, पण ऊस तोडणाºया मजुरांचे आणि वाहतूक करणाºया वाहनमालकांचेही नुकसान होते.‘कारखाने बंद पाडू’काही साखर कारखाने वजनात काटामारी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लवकरच वैधमापन विभागाकडे लेखी तक्रार करू. त्यांनी कारवाई केली तर ठीक़, नाही तर कारखान्यांचे हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिला आहे.