शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले दहा हजार हेक्टरने

By admin | Updated: July 30, 2015 00:27 IST

गाळपाचे आव्हान : शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक होण्याची चिन्हे; उत्पादक चिंतेत--लोकमत विशेष

अशोक डोंबाळे - सांगली -जिल्ह्यात २०१४-१५ यावर्षी ७४ हजार ४७९ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यामध्ये २०१५-१६ वर्षाच्या गळीत हंगामासाठी जाणाऱ्या उसाचे क्षेत्र दहा हजार हेक्टरने वाढून ८४ हजार ९६६ हेक्टर झाले आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी टप्प्यातील काही भागात फिरले आहे. या पाण्यावर शेतकऱ्यांनी अन्य पिके घेण्याऐवजी उसाचे पीक घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्राचा विचार केल्यास, येत्या ऊस गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील कारखान्यांकडून वेळेवर ऊस गाळपास जाईल, याची खात्री देता येणार नाही. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांबरोबरच दुष्काळी भागातील शेतकरीही उसाकडेच वळल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. दुष्काळी जत, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी फिरले आहे. येथील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करण्याची गरज होती. परंतु, पाणी उपलब्ध झाल्यामुळे तेथील शेतकरीही ऊस पिकाकडेच वळल्याचे दिसत आहे. जत तालुक्यातील उसाचे क्षेत्र ६०० हेक्टरवरून दुप्पट होऊन १२७४ हेक्टर झाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील २ हजार ६४९ हेक्टरवरून ३ हजार ८१० हेक्टर उसाचे क्षेत्र झाले आहे. आटपाडी, खानापूर तालुक्यात दुप्पट, तर कडेगाव तालुक्यात अडीच हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. शिराळा, तासगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातही एक ते दोन हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांची उसाची चिंता संपली आहे. मात्र, कारखानदारांनी वेळेत गळीत हंगाम सुरु केला तरच हा ऊस संपणार आहे. दराच्या प्रश्नावरून कारखानदारांनी वेळेवर हंगाम सुरु केला नाही, तर शिल्लक उसाचा प्रश्न भेडसावणार आहे. कारखानदारांनी वेळेवर ऊस गाळपास नेला नाही, तर फार मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.अन्य पिकांची शेतकऱ्यांना धास्तीउसाला चांगला दर मिळू लागल्यामुळे मागील दोन वर्षापासून शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. आता साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांना १५०० ते २२०० रुपयांपर्यंत दर दिला आहे. उर्वरित पैसे मिळतील, याची खात्री नाही. तरीही शेतकरी ऊस पिकाकडेच वळत आहे. अर्थात यामध्ये त्या शेतकऱ्यांचीही काही चूक नाही. कारण, अन्य पिकांना कधी अवकाळीचा फटका, तर कधी दलालांच्या साठेबाजीमुळे दराचा फटका बसतो. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. या सर्व अडचणी आणि समस्या असूनही शेतकरी ऊस पिकाकडेच वळत आहे. जिल्ह्यातील उसाचे तालुकानिहाय क्षेत्र तालुका २०१४-१५ २०१५-१६मिरज१४१७६१३९०६वाळवा२९००९२९९०६शिराळा४५३२६१०७तासगाव४२६९६४१०पलूस८९८५९२७४तालुका २०१४-१५ २०१५-१६कडेगाव८३००१०१२०खानापूर११०१३२८०आटपाडी८७६११८०क़महांकाळ२६४९३८१०जत६००१२७४