शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११,६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले

By admin | Updated: August 6, 2016 00:25 IST

कारखानदारांची होणार अडचण : ऊस उत्पादकांना मिळणार योग्य दर; यंदा पळवापळवी

सांगली : दुष्काळ आणि ऊस दरावरून शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक होत असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. २०१५-१६ वर्षाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखानदारांना ८३ हजार ९६६ हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध झाला होता. चालूवर्षी ११ हजार ६०८ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटल्यामुळे येत्या हंगामासाठी ७२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. परिणामी कारखानदारांमध्ये उसासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.संघटनांच्या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील तीन वर्षे चांगला दर मिळाला. पण, २०१५-१६ च्या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले. यातच साखर कारखानदारांकडूनही अडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. पहिल्या हप्त्याचे बिलही संघटना आणि साखर कारखानदारांच्या राजकीय कुरघोड्यात उशिरा मिळाले. काही साखर कारखानदारांनी तर साखरेचे दर उतरल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची दोन महिने बिले दिली नाहीत. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना दिला आहे. उसाला मिळणारा दर आणि त्याचा उत्पादन खर्च लक्षात घेतल्यास, ते परवडत नसल्यामुळे शेतकरी पर्यायी पिकाकडे वळला आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यातील शेतकरी सोयाबीन, भाजीपाला पिकाकडे सर्वाधिक वळला आहे. वाळवा तालुक्यात २०१५-१६ या वर्षात २९ हजार ६०५ हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये पाच हजार ४५७ हेक्टरनी उसाचे क्षेत्र घटले असून २०१६-१७ वर्षासाठी २४ हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. तासगाव तालुक्यात सर्वाधिक ५० टक्क्यांनी उसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. या तालुक्यात दुष्काळामुळे ऊसक्षेत्र घटल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र घटले आहे. (प्रतिनिधी)