शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

जिल्ह्यातून वाळू तस्करी वाढली

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

दर तेजीचा परिणाम : तहसीलदार वॉच ठेवणार

अंजर अथणीकर - सांगली --वाळूचा दर साडेसहा हजार रुपये ब्रासवर पोहोचल्याने जिल्ह्यामध्ये वाळू तस्करी वाढली आहे. कर्नाटकमधूनही चोरटी वाहतूक सुरु आहे. विशेषत: संगनमताने रात्रीचा वाळू उपसा सुरु झाला आहे.वाळू उपशाची मुदत ३० सप्टेंबररोजी संपली आहे. त्यामुळे वाळूचा तुटवडा जाणवत आहे. याचाच परिणाम म्हणून वाळूचे दर आता चार हजार रुपयांवरुन तब्बल साडेसहा हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. याचा फायदा वाळू तस्करांनी उठवायचे ठरवले आहे. रात्रीच्यावेळी नदीपात्रातून बेकायदा उपसा सुरु केला आहे. यासाठी स्थानिक परिसरातील पदाधिकाऱ्यांशी संगनमत करण्यात येत आहे. सध्या बांधकामे हंगाम सुरु झाल्याने बांधकाम व्यावसायिक वाळूसाठी चांगला दर देत आहेत. काही ठेकेदारांनी वाळूचा साठा केला असून त्याची विक्री चालू आहे. कर्नाटकमधूनही वाळूची आयात जोमाने सुरु आहे. कोणतीही रॉयल्टी न भरता तस्करी सुरु आहे. तीन ते साडेतीन हजार रुपयांनी वाळू खरेदी करुन त्याची विक्री तब्बल साडेसहा हजार रुपयांनी सुरु झाली आहे. यामुळे ठेकेदार मालामाल होत आहेत. यापूर्वी घेतलेल्या ठेक्याची मुदत ३० सप्टेंबरलाच संपली असतानाही त्यातून उपसा सुरु आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दहशतीमुळे त्यांचा व्यवसायही बिनबोभाट सुरु आहे. तलाठ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. वाळू व्यवसायामध्ये गुंडगिरी घुसल्याने प्रशासनही त्याकडे कानाडोळा करीत आहेत. महसूल कर्मचाऱ्यांवर तस्करांचे हल्ले हे नेहमीचेच झाले आहे. यावर निर्बंध आणण्याची मागणी होत आहे. बेकायदा वाळू उपशावर निर्बंध आणण्यासाठी तहसीलदारांनी मोहीम राबविण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ५१ वाळूचे ठेके मंजुरीच्या प्रतीक्षेतसांगली जिल्हा प्रशासनाकडून राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे जिल्ह्यातील ५१ वाळू ठेक्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत. येत्या आठवड्याभरात या प्रस्तावांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या ५१ वाळू प्लॉटमधील उपशासाठी संबंधित ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आली आहे. गतवर्षी १२४ पैकी ५१ वाळू ठेक्यांचा लिलाव झाला होता. यामधून जिल्हा प्रशासनाला सुमारे तीस कोटींचा महसूल मिळाला होता. वाळू ठेक्यांचे लिलाव निघाले नसले तरी अवैध वाळू तस्कारी सुरुच आहे. तरीही महसूल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाळू तस्करांचे फावले आहे.