शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

ऊस उत्पादकांची राजू शेट्टींकडून फसवणूक

By admin | Updated: October 28, 2015 00:02 IST

अशोक ढवळे, अजित नवले : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ६ नोव्हेंबरला धरणे आंदोलन--प्रश्न उसाच्या एफआरपीचा

सांगली : उसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी देणे कायद्यानेच कारखान्यांना बंधनकारक असताना, खा. राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व डॉ. उदय नारकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, ऊस उत्पादकांना डॉ. स्वामिनाथन् समितीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च आणि त्यावर ५० टक्के नफा देण्याच्या हमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचे खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगत होते. सध्या मात्र मोदींनी स्वामिनाथन् समितीच्या शिफारशी लागू करण्यास नकार दिला आहे, तरीही खा. राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मोदी यांची साथ सोडण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांचे ऊस दराकडील लक्ष विचलित करण्यासाठी एफआरपी एकरकमी मिळावी, यासाठी ते आंदोलनाचा इशारा देत आहेत. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील गळीत हंगामातील अंतिम बिले मिळालेली नाहीत, याकडे खा. शेट्टींनी दुर्लक्ष केले आहे. याउलट एफआरपीची रक्कम कारखानदारांनी एकरकमीच दिली पाहिजे. त्या प्रश्नावर शेट्टी आंदोलन करून काय साध्य करणार आहेत, हे कळत नाही. शेट्टी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वादात शेतकऱ्यांचे व साखर उद्योगाचे नुकसान होणार आहे. या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३७५० रुपये दर मिळाला पाहिजे. दि. १४ डिसेंबर रोजी राज्यातील देवस्थान जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातारा येथे मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी सचिव किसन गुजर, सहसचिव अजित नवले, उमेश देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)