शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साखर कारखानदारीला सध्या वाईट दिवस

By admin | Updated: November 14, 2014 23:23 IST

पी. आर. पाटील : कारंदवाडीत राजारामबापू युनिट दोनच्या हंगामास सुरुवात

आष्टा : साखर कारखानदारीला वाईट दिवस आले आहेत. दिवसेंदिवस साखरेचे दर घसरत आहेत़ केंद्र व राज्य शासनाने या उद्योगाला प्रामाणिक मदत करायला हवी़ पूर्वी खासगीकडून सहकारी साखर कारखानदारीकडे लोक वळले़ आता सहकारातील लोक खासगीकरणाकडे वळत आहेत, हे अयोग्य आहे, असे प्रतिपादन राजारामबापू सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.कारंदवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिटच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी ते बोलत होते. पत्रकार विजय चोरमारे, माजी आमदार विश्वासराव पाटील, जि़ प़ चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पी. आर. पाटील म्हणाले की, आम्ही येथील शेतकऱ्यांना चांगला दर दिला आहे. तसेच कामगारांना न्याय देऊन, दिलेला शब्द पाळला आहे़ आम्ही ऊस तोडणी कार्यक्रम काटेकोरपणे राबविल्याने चांगला साखर उतारा मिळाला़ राजारामबापूंनी डिस्टिलरी, देशी-विदेशी मद्य, तसेच जयंत पाटील यांनी को-जन हे प्रकल्प उभे केल्याने शेतकऱ्यांना आम्ही चार पैसे जादा दर देऊ शकत आहोत़ ‘सर्वोदय’चे उपाध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, संचालक नंदकुमार पाटील, रमेश हाके, संपतराव पाटील, दिनकर पाटील,भगवान पाटील, जानकास ढोले, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, लालासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, दिलीपराव पाटील, बाळासाहेब पाटील, प्रदीप थोरात, भीमराव पवार, कार्तिक पाटील, जे़ वाय़ पाटील, वसंतराव कदम, डी़ बी़ पाटील, जालिंदर कांबळे, सौ़ मेघाताई पाटील, दुधगावचे अविनाश कुदळे, उपस्थित होते़ संचालक एल़ बी़ माळी यांनी आभार मानले़ संपर्क अधिकारी डी़ आऱ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)