शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:45 IST

सांगली : ऊसदरावर तोडगा निघून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारपासून ...

सांगली : ऊसदरावर तोडगा निघून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्व भागातील ऊसतोडी गतीने सुरू झाल्या आहेत. कारखान्यांची धुराडी पेटली असून, वादाचा कडवटपणा जाऊन हंगामाचा गोडवा कारखानदारांच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यामुळे दराचा तोडगा काढण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. शनिवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाबाबत यशस्वी तोडगा निघाल्यानंतर रात्री वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावर जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीतही कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आंदोलक व कारखानदारांनी मान्य केल्यानंतर रात्री उशिरा रविवारी होणारे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. एकरकमी एफआरपी तसेच साखरेला ३ हजार ४०० रुपये दर मिळाल्यास प्रतिटन २०० रुपये अधिक दर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आंदोलन मागे घेतल्याने रविवारी सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात ऊसतोडीला सुरुवात झाली.सांगलीतील दत्त इंडिया प्रा. लि. चा वसंतदादा कारखाना, राजारामबापू कारखान्याचे चारही युनिट, सोनहिरा, क्रांती, हुतात्मा, मोहनराव शिंदे यासह सर्व प्रमुख सहकारी साखर कारखाने, खासगी कारखान्यांची धुराडी रविवारी पेटली. ऊसतोडीला वेग आल्याने दिवसभर मजुरांची, वाहनांची लगबग सुरू होती. रस्त्यावरील ऊसवाहतूक करणाºया वाहनांची संख्याही वाढली होती. मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, आटपाडी, पलूस याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी सुरू होत्या.दत्त इंडियाचे कार्यकारी संचालक मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री तोडगा निघाल्याने कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. रविवारी आम्ही पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू केला असून, तोडींनाही प्रारंभ झाला आहे. आता कोणतीही अडचण नाही. हा हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल, अशी आशा आहे.