शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संजयकाकांच्या कारखान्यांना साखर आयुक्तांची 'आरआरसी' नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर या दोन कारखान्यांकडे ...

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर या दोन कारखान्यांकडे ४४ कोटी ६४ लाख रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकीत आहे. याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई केली आहे. महसूल प्रशासनाने कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

संजयकाका यांच्या मालकीचे असलेल्या तुरची (ता. तासगाव) येथील तासगाव एसजीझेड व एसजीऐ शुगर या कारखान्यांकडे ३१ मार्च २०२१ अखेरीस शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाची ३९ कोटी चार लाख रुपये एफआरपीची रक्कम होती. त्यापैकी दहा कोटी ५७ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित २८ कोटी ४७ लाख रुपये थकीत आहेत. नागेवाडी येथील यशवंत शुगर कारखान्यांकडे एफआरपीची एकूण रक्कम ३२ कोटी ३७ लाख रुपये होते. त्यापैकी शेतकऱ्यांना १६ कोटी २० लाख रुपये मिळाले असून १६ कोटी १७ लाख रुपये थकीत आहेत. याबद्दल शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार साखर आयुक्तांनी संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर आणि यशवंत शुगरला थकबाकीप्रकरणी आरआरसीची नोटीस बजावली आहे. या नोटीसवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

चौकट

सदगुरु श्री श्री, हुतात्मा कारखान्यास यलो कार्ड

राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सदगुरु श्री श्री या कारखान्याने १५० कोटी पाच लाख एकूण एफआरपीपैकी ९१ कोटी ८० लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. ५८ कोटी २५ लाख रुपये थकीत आहेत. वाळवा येथील हुतात्मा कारखान्याने ११८ कोटी आठ लाख एकूण एफआरपीपैकी १०६ कोटी २७ लाख रुपये म्हणजे ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. ११ कोटी ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. याप्रकरणी या कारखान्यांना साखर आयुक्तांनी यलो कार्ड दिले असून तात्काळ शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची सूचना दिली आहे.

चौकट

११ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिपेहळ्ळी हे चार युनिट, क्रांती, मोहनराव शिंदे, विश्वासराव नाईक, दालमिया, वसंतदादा-दत्त इंडिया, सोनहिरा, उदगिरी शुगर या ११ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.