शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

संजयकाकांच्या कारखान्यांना साखर आयुक्तांची 'आरआरसी' नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर या दोन कारखान्यांकडे ...

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर या दोन कारखान्यांकडे ४४ कोटी ६४ लाख रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकीत आहे. याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई केली आहे. महसूल प्रशासनाने कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

संजयकाका यांच्या मालकीचे असलेल्या तुरची (ता. तासगाव) येथील तासगाव एसजीझेड व एसजीऐ शुगर या कारखान्यांकडे ३१ मार्च २०२१ अखेरीस शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाची ३९ कोटी चार लाख रुपये एफआरपीची रक्कम होती. त्यापैकी दहा कोटी ५७ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित २८ कोटी ४७ लाख रुपये थकीत आहेत. नागेवाडी येथील यशवंत शुगर कारखान्यांकडे एफआरपीची एकूण रक्कम ३२ कोटी ३७ लाख रुपये होते. त्यापैकी शेतकऱ्यांना १६ कोटी २० लाख रुपये मिळाले असून १६ कोटी १७ लाख रुपये थकीत आहेत. याबद्दल शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार साखर आयुक्तांनी संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीऐ शुगर आणि यशवंत शुगरला थकबाकीप्रकरणी आरआरसीची नोटीस बजावली आहे. या नोटीसवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

चौकट

सदगुरु श्री श्री, हुतात्मा कारखान्यास यलो कार्ड

राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सदगुरु श्री श्री या कारखान्याने १५० कोटी पाच लाख एकूण एफआरपीपैकी ९१ कोटी ८० लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. ५८ कोटी २५ लाख रुपये थकीत आहेत. वाळवा येथील हुतात्मा कारखान्याने ११८ कोटी आठ लाख एकूण एफआरपीपैकी १०६ कोटी २७ लाख रुपये म्हणजे ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. ११ कोटी ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. याप्रकरणी या कारखान्यांना साखर आयुक्तांनी यलो कार्ड दिले असून तात्काळ शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची सूचना दिली आहे.

चौकट

११ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिपेहळ्ळी हे चार युनिट, क्रांती, मोहनराव शिंदे, विश्वासराव नाईक, दालमिया, वसंतदादा-दत्त इंडिया, सोनहिरा, उदगिरी शुगर या ११ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.