शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर गाडगीळांनी शब्द पाळावा, अन्यथा घरासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:25 IST

सांगली : शहरातील चैत्रबन ते आरवाडे पार्क या नाल्याच्या बांधकामासाठी दहा कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला; पण स्थायी ...

सांगली : शहरातील चैत्रबन ते आरवाडे पार्क या नाल्याच्या बांधकामासाठी दहा कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला; पण स्थायी समितीत सत्तेत असलेल्या भाजपने या कामाला खो घातला आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना सर्व माहिती कागदपत्रांसह दिली आहे. त्यांनी ठराव मंजूर करून देण्याचा शब्द दिला होता. तो न पाळण्यास त्यांच्या घर आणि कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला.

पाटील म्हणाले की, १४ व्या वित्त आयोगातून काही निधी शिल्लक राहिला होता. या निधीतून नाला बांधकामाचा ठराव तत्कालीन महापौर संगीता खोत यांच्या काळात करण्यात आला. ठरावानुसार प्रशासनाने चैत्रबन ते आरवडे पार्क या नाल्याचा बांधकामास आराखडा तयार करण्यात आला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून या नाल्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शासनाने स्पष्टपणे याच नाल्याचा उल्लेख करून महापालिकेला पत्र पाठवले.

मात्र, स्थायी समितीत भाजपची सत्ता असल्याने सभापतींनी या कामाची निविदा काढण्याचा विषय प्रलंबित ठेवला. आ. गाडगीळ यांच्या सांगण्यावरून हा विषय प्रलंबित ठेवल्याचे सभापतींनी सांगितले. याबाबत आमदार गाडगीळ यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना सर्व कागदपत्रे दाखविली. त्यांनी आठवड्यानंतर हा विषय विषयपत्रिकेवर घेऊन मंजूर करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, एक महिन्यानंतर म्हणजे २५ रोजीच्या सभेत विषयपत्रिकेवर हा विषय घेतला आहे.

त्यातही आता स्थायी समितीकडून बेकायदेशीररीत्या दहा कोटींच्या निधीचे विभाजन करण्याचा डाव आखला आहे. काँग्रेस नगरसेवकाच्या वाॅर्डातील काम असल्याने भाजपकडून आकसापोटी अडवणूक सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आ. गाडगीळ यांनी कायदेशीर ठराव पारित करण्याची सूचना सभापतींना द्यावी, बेकायदेशीर ठराव झाल्यास गाडगीळ व सभापती पांडुरंग कोरे यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

चौकट

स्थायी समिती बरखास्तीसाठी पाठपुरावा

शासनाने चैत्रबन नाल्यासाठी दहा कोटींचा निधी दिला आहे. या निधीत विभाजन झाल्यास तो शासनाच्या आदेशाचा अवमान ठरतो. त्यामुळे बेकायदेशीर ठराव करणारी स्थायी समिती बरखास्त करावी, यासाठी शासन व न्यायालय स्तरावर लढा उभा करू. हा ठराव विखंडितसाठी शासनाकडे पाठपुरावा करू. प्रसंगी न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा संतोष पाटील यांनी दिला.