शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

सालेकिरीत तिघींचा बुडून मृत्य

By admin | Updated: July 10, 2014 00:46 IST

मृतांत सख्ख्या बहिणी : पवनचक्की कंपनीविरुद्ध गुन्हाू

जत : जत तालुक्यातील सालेकिरी येथे वीस फूट खड्ड्यातील पाण्यात बुडून सख्ख्या बहिणींसह तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. पूजा रवींद्र पाटील (वय १३), निकिता रवींद्र पाटील (११) आणि ऐश्वर्या राजू धोडमणी (७) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा खड्डा पवनऊर्जा कंपनीने मुरुम उचलण्यासाठी काढला होता. तहसीलदार दीपक वजाळे यांनी घटनास्थळास भेट देऊन संबंधित कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सालेकिरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सालेकिरी ते पाच्छापूर रस्त्यावर सालेकिरीपासून अर्धा किलोमीटरवर पाटील वस्ती आहे. तेथील बाबासाहेब सावंत व आप्पासाहेब सावंत यांच्या मालकीची वतन शेतजमीन पुरनदास व्हनखंडे यांनी एक वर्षापूर्वी खरेदी केली आहे. परंतु, त्यांच्या नावाची नोंद अद्याप झालेली नाही. व्हनखंडे यांनी जमिनीत खड्डा खोदून मुरुम उचलण्यास पवनऊर्जा कंपनीला तोंडी परवानगी दिली आहे. पाटील वस्तीलगतच मुरुमासाठी वीस फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. या पाण्यानेच या तिघींचा घात केला. पाटील यांना चार मुली व एक मुलगा आहे, तसेच धोडमणी यांनाही चार मुली व एक मुलगा आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी मुलींना पाण्यातून बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. विलासराव जगताप, पंचायत समिती सदस्य नितीन शिंदे, सुनील पवार, नगरसेवक उमेश सावंत व बापूसाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाटील व धोडमणी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. (वार्ताहर)