शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

सालेकिरीत तिघींचा बुडून मृत्य

By admin | Updated: July 10, 2014 00:46 IST

मृतांत सख्ख्या बहिणी : पवनचक्की कंपनीविरुद्ध गुन्हाू

जत : जत तालुक्यातील सालेकिरी येथे वीस फूट खड्ड्यातील पाण्यात बुडून सख्ख्या बहिणींसह तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. पूजा रवींद्र पाटील (वय १३), निकिता रवींद्र पाटील (११) आणि ऐश्वर्या राजू धोडमणी (७) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा खड्डा पवनऊर्जा कंपनीने मुरुम उचलण्यासाठी काढला होता. तहसीलदार दीपक वजाळे यांनी घटनास्थळास भेट देऊन संबंधित कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सालेकिरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सालेकिरी ते पाच्छापूर रस्त्यावर सालेकिरीपासून अर्धा किलोमीटरवर पाटील वस्ती आहे. तेथील बाबासाहेब सावंत व आप्पासाहेब सावंत यांच्या मालकीची वतन शेतजमीन पुरनदास व्हनखंडे यांनी एक वर्षापूर्वी खरेदी केली आहे. परंतु, त्यांच्या नावाची नोंद अद्याप झालेली नाही. व्हनखंडे यांनी जमिनीत खड्डा खोदून मुरुम उचलण्यास पवनऊर्जा कंपनीला तोंडी परवानगी दिली आहे. पाटील वस्तीलगतच मुरुमासाठी वीस फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. या पाण्यानेच या तिघींचा घात केला. पाटील यांना चार मुली व एक मुलगा आहे, तसेच धोडमणी यांनाही चार मुली व एक मुलगा आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी मुलींना पाण्यातून बाहेर काढून जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. विलासराव जगताप, पंचायत समिती सदस्य नितीन शिंदे, सुनील पवार, नगरसेवक उमेश सावंत व बापूसाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाटील व धोडमणी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. (वार्ताहर)