शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी सुरू

By admin | Updated: October 25, 2016 01:04 IST

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीकडून शेखर गोरेंचेही नाव चर्चेत

सांगली : सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षीय संख्याबळापेक्षा उमेदवारांच्या वैयक्तिक ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी केली जात आहे. काँग्रेसने मोहनराव कदमांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले असतानाच, राष्ट्रवादीतून दिलीपतात्या पाटील यांच्यापाठोपाठ आता माण तालुक्यातील शेखर गोरे यांचेही नाव चर्चेत आले आहे. या दोन्ही उमेदवारांच्या बळाची चाचपणी सुरू आहे. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत यंदा आघाडी मोडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची मानसिकता केली आहे. काँग्रेसने याबाबतचे स्पष्ट संकेत दिले असून राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या उमेदवारासमोर तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. सांगली जिल्ह्यातून माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे निष्ठावंत दिलीपतात्या पाटील यांचे नाव पुढे आले आहे. दिलीपतात्यांनीही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शेखर गोरेंसारखा सर्व बाजूंनी तगडा उमेदवारही चर्चेत आणला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या ताकदीची चाचपणी केली जात आहे. दोन्ही इच्छुक तुल्यबळ असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मोहनराव कदम यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. पतंगराव कदम, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्यांच्या कमिटीमार्फत मोहनराव कदम यांच्या नावाची शिफारस केली आहे. मोहनराव कदम यांना त्यांचे बंधू पतंगराव कदम यांची ताकद लाभणार असल्याने, तितक्या तोडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत आहे. सद्य:स्थितीत मतदारांच्या संख्याबळाचे गणित राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेले आहे. तरीही या मतदार संघातील गेल्या काही निवडणुकांचा आढावा घेतला असता, संख्याबळापेक्षा उमेदवारांच्या व्यक्तिगत ‘अर्थ’पूर्ण ताकदीचाच जास्त प्रभाव पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व गोष्टींची आकडेमोड दोन्ही पक्षांतील नेते करीत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. (प्रतिनिधी) भाजप, सेना शांत : भूमिकेकडे लक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत कमी संख्याबळ असलेल्या भाजप व शिवसेनेने सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करीत असल्याने या दोन्ही पक्षांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. अन्य पक्षांच्या सदस्यांना खेचण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी आतापासूनच प्रयत्न चालविले आहेत. मतदारसंघात निवडून येण्याइतपत संख्याबळ नसल्याने भाजप, सेना शांत असले तरी, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक न लढविण्याचा निर्णय या पक्षांनी घेतल्यानंतर त्यांच्या सदस्यांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत.