शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

सांगली जिल्ह्यात १४ लाख रोपे जगवण्यात यश

By admin | Updated: June 5, 2014 00:21 IST

रोहयोचाही उपक्रम : वनक्षेत्र वाढणे अशक्य

अंजर अथणीकर ल्ल सांगली जिल्ह्यामध्ये झालेला चांगला पाऊस व प्रशासनाने वृक्ष लागवडीऐवजी संवर्धनाकडे लक्ष दिल्यामुळे १७ लाखपैकी १४ लाख वृक्ष जगवण्यामध्ये त्यांना यश आले आहे. मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. पहिल्यांदाच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून निराधार, वृध्दांसाठी वृक्ष संवर्धनासाठी रोजगार उपलब्ध करून दिल्याने वृक्ष जोपासण्यात मोठी मदत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वन क्षेत्र वाढवणे मोठे आव्हान असल्याचे जाणकार बोलत आहेत. प्रशासनाने गतवर्षी जिल्ह्यात वीस लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी प्रत्यक्षात सतरा लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. यापूर्वी ५० टक्क्यांहून कमी प्रमाणात वृक्ष जगत होते. यावर्षी मात्र लागवड केलेल्या रोपांपैकी जवळपास ८० टक्के म्हणजे चौदा लाख वृक्ष जगले आहेत. ही बाब मे महिन्यात वन विभागासह इतर विभागांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला त्याचबरोबर पावसाळा लांबलाही होता. जानेवारीपासून मेपर्यंत अवकाळी पावसानेही अनेकदा हजेरी लावल्याने वृक्ष जगण्यास मदत झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच वृक्ष संवर्धनासाठी महात्मा गांधी रोजगार योजनेच्या माध्यमातून उपक्रम राबवला. सुमारे हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिक, निराधार, अपंग आदींनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा रोजगार मिळाला होता. या लोकांना खड्डे खणून वृक्ष लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी त्यांना रोजगार देण्यात आला. त्यांनी उन्हाळ्यातही या रोपांना पाणी घातल्याने मोठ्याप्रमाणात वृक्ष जगवण्यास यंदा मदत झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यामातून जिल्ह्यात ७ हजार ७९४ मजूर काम करीत असून, यापैकी सुमारे एक हजार मजूर वृक्ष संवर्धनासाठी काम करीत आहेत. आगामी वर्षासाठी १५ लाख ८७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी खड्डे खणण्याचे काम अद्याप सुरू असून, या महिन्याच्या मध्यापासून वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे.