शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सांगली जिल्ह्यात १४ लाख रोपे जगवण्यात यश

By admin | Updated: June 5, 2014 00:21 IST

रोहयोचाही उपक्रम : वनक्षेत्र वाढणे अशक्य

अंजर अथणीकर ल्ल सांगली जिल्ह्यामध्ये झालेला चांगला पाऊस व प्रशासनाने वृक्ष लागवडीऐवजी संवर्धनाकडे लक्ष दिल्यामुळे १७ लाखपैकी १४ लाख वृक्ष जगवण्यामध्ये त्यांना यश आले आहे. मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. पहिल्यांदाच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून निराधार, वृध्दांसाठी वृक्ष संवर्धनासाठी रोजगार उपलब्ध करून दिल्याने वृक्ष जोपासण्यात मोठी मदत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वन क्षेत्र वाढवणे मोठे आव्हान असल्याचे जाणकार बोलत आहेत. प्रशासनाने गतवर्षी जिल्ह्यात वीस लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी प्रत्यक्षात सतरा लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. यापूर्वी ५० टक्क्यांहून कमी प्रमाणात वृक्ष जगत होते. यावर्षी मात्र लागवड केलेल्या रोपांपैकी जवळपास ८० टक्के म्हणजे चौदा लाख वृक्ष जगले आहेत. ही बाब मे महिन्यात वन विभागासह इतर विभागांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला त्याचबरोबर पावसाळा लांबलाही होता. जानेवारीपासून मेपर्यंत अवकाळी पावसानेही अनेकदा हजेरी लावल्याने वृक्ष जगण्यास मदत झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच वृक्ष संवर्धनासाठी महात्मा गांधी रोजगार योजनेच्या माध्यमातून उपक्रम राबवला. सुमारे हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिक, निराधार, अपंग आदींनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा रोजगार मिळाला होता. या लोकांना खड्डे खणून वृक्ष लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी त्यांना रोजगार देण्यात आला. त्यांनी उन्हाळ्यातही या रोपांना पाणी घातल्याने मोठ्याप्रमाणात वृक्ष जगवण्यास यंदा मदत झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यामातून जिल्ह्यात ७ हजार ७९४ मजूर काम करीत असून, यापैकी सुमारे एक हजार मजूर वृक्ष संवर्धनासाठी काम करीत आहेत. आगामी वर्षासाठी १५ लाख ८७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी खड्डे खणण्याचे काम अद्याप सुरू असून, या महिन्याच्या मध्यापासून वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे.