शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी भरीव तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:29 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. कोविडसह अनेक संकटांशी झगडत असलेल्या राज्य सरकार आणि राज्यातील ...

राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. कोविडसह अनेक संकटांशी झगडत असलेल्या राज्य सरकार आणि राज्यातील जनतेसाठी हा संतुलित अर्थसंकल्प आहे. यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कदम म्हणाले की, गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटाचा सामना करूनही कृषी क्षेत्रात ११.७ टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महात्मा फुले शेतकरी पीककर्ज योजना अतिशय सुलभ असून त्याचा ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला. ४२ हजार कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप झाले.

येत्या आर्थिक वर्षांत तीन लाखांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याची तरतूद केली आहे. कृषीमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विकला जातो. तेथे मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली. राज्यात कृषी पंप जोडणी धोरण सुरू केले जाणार असून, त्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी महावितरणला दिला जाणार आहे. फळ व भाजीपाला उत्पादन आणि उद्योगासाठी 'मॅग्नेट' योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी एक हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

वरूड मोर्शी येथे संत्री प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी होणार आहे. राज्यात अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका उभारण्यात येणार आहे. कृषी संशोधनासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपये याप्रमाणे पुढील तीन वर्षांसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसायासाठी भरीव अर्थ साहाय्य होणार आहे.

बर्ड फ्लूसारख्या रोगांचा सामना करण्यासाठी पुण्यात अत्याधुनिक जैव सुरक्षा प्रयोगशाळेची स्थापना केली जाणार आहे. रेशीम उद्योगासाठी चिखलठाणा येथे विशेष केंद्राची स्थापना केली जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

फोटो : विश्वजित कदम यांचा फोटो वापरणे