शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांबाबत फौजदारी दाखल करा

By admin | Updated: August 27, 2014 23:17 IST

सीईओंचे आदेश : ‘भारत निर्माण’चा बट्ट्याबोळ

मिरज : मिरज तालुक्यातील सात गावांत भारत निर्माण योजनेच्या अपूर्ण कामांबाबत अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पंचायत समिती छोटे पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता एकनाथ नागरगोजे यांनी दिली. मिरज तालुक्यातील टाकळी, बोलवाड, सुभाषनगर, नरवाड, बिसूर, संतोषवाडी व विजयनगर या सात गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भारत निर्माण योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मंजुरीनंतर वर्ष ते दीड वर्षात योजना पूर्ण करावयाच्या होत्या. वारंवार मुदतवाढ देऊनही त्या आठ वर्षात अपूर्णच आहेत. टाकळी, बोलवाड व सुभाषनगर येथील योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली असली, तरी योजनेत समाविष्ट असलेल्या हुळ्ळे प्लॉटपर्यंतचे काम न झाल्याने हे काम अपूर्ण आहे. नरवाड येथे २ कोटी २० लाखांची योजना मंजूर आहे. या निधीतून केवळ जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. योजनेची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. बिसूर येथे मंजूर १७ लाख निधीपैकी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सात लाख रुपये खर्चाचा हिशेबच उपलब्ध नाही. संतोषवाडी येथील योजनेचा समावेश असलेल्या वस्त्यांचे काम अपूर्ण आहे. विजयनगर येथील भारत निर्माण योजनेवर खर्च करण्यात आलेल्या खर्चाच्या हिशेबाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. मुदतवाढ देऊनही भारत निर्माण योजनेचे काम वेळेत न करणे, दर्जाहीन कामे, निधीचा अपहार याची गांभीर्याने दखल घेऊन या योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले. (वार्ताहर)आठवड्याभरात कारवाई होणारभारत निर्माण योजनेतील अनियमितता व हिशेबातील गोंधळ याची दखल घेऊन भारत निर्माण योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर फौजदारी दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी अभियंता नागरगोजे यांनी सांगितले.