शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

संघर्ष यात्रा आज सांगली जिल्ह्यात

By admin | Updated: April 26, 2017 00:13 IST

संघर्ष यात्रा आज सांगली जिल्ह्यात

सांगली : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, वाढीव वीजबिले रद्द व्हावीत यांसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांची संघर्ष यात्रा मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगलीत दाखल झाली. ही यात्रा आज, बुधवारी जिल्ह्यात जाणार असून कवठेमहांकाळ, तासगाव आणि कासेगाव येथे होणाऱ्या सभेत दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. सांगलीत बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तटकरे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढली असून, त्याला शेतकऱ्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्जमाफी, तूर खरेदीबाबत शासन दिरंगाई करीत आहे. कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तूर खरेदी शासनाने तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, आ. सुमनताई पाटील, आदी नेते या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत. संघर्ष यात्रा बुधवारी सकाळी सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहापासून कवठेमहांकाळकडे रवाना होणार आहे. साडेदहा वाजता कवठेमहांकाळ येथे त्या तालुक्यासह जत येथील शेतकरी, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. दुपारी एक वाजता तासगाव येथील मार्केट कमिटीजवळ सभा होणार असून, दुपारी अडीच वाजता येळावी फाटा येथे भारती ग्रामीण रुग्णालयात पलूस, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतर यात्रा सायंकाळी वाळवा तालुक्याकडे रवाना होणार आहे. राजारामबापू कारखान्यावर काहीकाळ थांबून नंतर कासेगाव येथील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाजवळ येऊन तेथे सभा होणार आहे.संघर्ष यात्रेची सर्व तयारी स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. स्थानिक दुष्काळी परिस्थिती, रखडलेल्या सिंचन योजना, वीज बिलाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतच्या आकडेवारीचा आढावा घेऊन येथील प्रश्नांवर सभांच्या माध्यमातून चर्चा घडविली जाणार आहे. कासेगाव येथील सभा संपल्यानंतर बुधवारी रात्री यात्रा कऱ्हाडकडे रवाना होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)सदाभाऊ तर भाजपचे आमदार : तटकरेकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा शेतकरी चळवळीशी दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही. ते शेतकरी संघटनेचे नव्हे, तर भाजपचे आमदार आहेत. विधिमंडळात त्यांनी भाजपचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी संघर्ष यात्रेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सांगलीत सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्षयात्रा रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगलीत दाखल झाली.