शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रा आज सांगली जिल्ह्यात

By admin | Updated: April 26, 2017 00:13 IST

संघर्ष यात्रा आज सांगली जिल्ह्यात

सांगली : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, वाढीव वीजबिले रद्द व्हावीत यांसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांची संघर्ष यात्रा मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगलीत दाखल झाली. ही यात्रा आज, बुधवारी जिल्ह्यात जाणार असून कवठेमहांकाळ, तासगाव आणि कासेगाव येथे होणाऱ्या सभेत दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. सांगलीत बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तटकरे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढली असून, त्याला शेतकऱ्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्जमाफी, तूर खरेदीबाबत शासन दिरंगाई करीत आहे. कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तूर खरेदी शासनाने तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, आ. सुमनताई पाटील, आदी नेते या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत. संघर्ष यात्रा बुधवारी सकाळी सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहापासून कवठेमहांकाळकडे रवाना होणार आहे. साडेदहा वाजता कवठेमहांकाळ येथे त्या तालुक्यासह जत येथील शेतकरी, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. दुपारी एक वाजता तासगाव येथील मार्केट कमिटीजवळ सभा होणार असून, दुपारी अडीच वाजता येळावी फाटा येथे भारती ग्रामीण रुग्णालयात पलूस, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतर यात्रा सायंकाळी वाळवा तालुक्याकडे रवाना होणार आहे. राजारामबापू कारखान्यावर काहीकाळ थांबून नंतर कासेगाव येथील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकाजवळ येऊन तेथे सभा होणार आहे.संघर्ष यात्रेची सर्व तयारी स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. स्थानिक दुष्काळी परिस्थिती, रखडलेल्या सिंचन योजना, वीज बिलाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतच्या आकडेवारीचा आढावा घेऊन येथील प्रश्नांवर सभांच्या माध्यमातून चर्चा घडविली जाणार आहे. कासेगाव येथील सभा संपल्यानंतर बुधवारी रात्री यात्रा कऱ्हाडकडे रवाना होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)सदाभाऊ तर भाजपचे आमदार : तटकरेकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा शेतकरी चळवळीशी दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही. ते शेतकरी संघटनेचे नव्हे, तर भाजपचे आमदार आहेत. विधिमंडळात त्यांनी भाजपचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी संघर्ष यात्रेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सांगलीत सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्षयात्रा रात्री पावणेदहाच्या सुमारास सांगलीत दाखल झाली.