शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
2
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
3
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
4
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
5
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
6
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
7
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
8
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
9
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
10
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
11
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
12
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
13
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
14
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
15
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
16
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
17
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
18
आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
19
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
20
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
Daily Top 2Weekly Top 5

कणखर नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

कार्यकर्त्यावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार मानसिंगराव नाईक हे नेहमीच घेत आले ...

कार्यकर्त्यावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार मानसिंगराव नाईक हे नेहमीच घेत आले आहेत. ते कार्यकर्त्याना वेळाेवेळी बळ देतात. अनेक वर्षे ते शिराळा व वाळवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये वाढतच जात आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जिवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले. कार्यकर्त्यांवर ते जिवापाड प्रेम करतात. सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यामुळेच त्यांच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची फळी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक दबदबा निर्माण केला आहे. दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माझ्या कार्यकर्त्याला कसे बळ मिळेल, त्याचा मान-सन्मान कसा वाढेल, त्याचबरोबर सामान्य माणसांच्या जीवनात काहीतरी चांगले घडावे आणि ते आपण घडवावे, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. २०१९ च्या निवडणुकीत आमदार म्हणून जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. दरम्यान, विरोधकांना थोपवून धरत, प्रसंगी त्यांच्यावर मात करून भाऊंनी पक्ष बळकट केला. पक्षावर त्यांनी निष्ठा ठेवून काम केले. पक्षासंदर्भात अशी निष्ठा बाळगून त्यांना काय मिळाले? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

आमदार मानसिंगराव नाईक यांचे कार्यकर्ते नेहमीच त्यांच्या निष्ठेचे दाखले देत असतात. मात्र राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. त्यांनी अनेक वेळा संयम बाळगल्याने निष्ठावंतांच्या यादीत त्यांचे स्थान अग्रभागी आहे. समाजकारण आणि राजकारणातील चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी तालुक्यामध्ये विश्वास उद्योग समूह, विराज उद्योग समूह अशा संस्था उभारून शेतकरी आणि तरुणांसाठी राेजगाराच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले. संस्था कशा असाव्यात, याचे आदर्श उदाहरण म्हणून या संस्थांचा उल्लेख होतो.

सत्तेचे पाठबळ असो अगर नसो; आपल्या विचार व कृतीवर ठामपणे उभे राहणाऱ्या या नेत्याने राजकारणातील साधनशुचितेला प्राधान्य दिले. कधीही विचारांशी तडजोड केली नाही किंवा कुणाशी अभद्र युतीही केली नाही.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैशिष्ट्य त्यांना इतर राजकारण्यांपासून वेगळे बनविते. आपल्या विचारांशी अशी बांधिलकी जपणारा राजकारणी आजच्या राजकारणात अभावानेच आढळतो. उभे आयुष्य सामान्य माणसाला उभे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या कणखर नेतृत्वाला परमेश्वर निरोगी, दीर्घायुष्य देवो! वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा..!

------------------------— शंकर वसंत मोहिते

(खोतवाडी-सोनवडे)