शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इस्लामपुरात तलाठ्यांचे दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

इस्लामपूर : तीन तलाठ्यांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही वाळवा, शिराळा तालुक्यातील तलाठ्यांनी काम ...

इस्लामपूर : तीन तलाठ्यांना प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी दुसऱ्या दिवशीही वाळवा, शिराळा तालुक्यातील तलाठ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले. प्रांतांवरील कारवाईचा अहवाल शासनाला सादर करून त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तोडकर यांनी दिला आहे.

मंगळवारी, १६ मार्चच्या रात्री कार्यालयीन वेळेनंतर प्रांताधिकारी पाटील यांनी तलाठी अमर साळुंखे, अविनाश पाटील, महादेव वंजारी अशा तिघांना बोलावून घेतले. त्यानंतर कोर्टरूममध्ये जोराने आरडाओरडा आणि अर्वाच्य शिवीगाळ करत प्रांताधिकारी पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप या तलाठ्यांनी केला. या घटनेचे पडसाद विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचले आहेत. तलाठी संघटनेने आयुक्तांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. तसेच सोमवारपासून राज्यभरात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष गौस महंमद लांडगे, वाळवा तालुकाध्यक्ष अतिष रसाळ, शिराळा तालुकाध्यक्ष महादेव वंजारी, तानाजी पवार, महादेव पाटील, जगन्नाथ कदम, विनायक यादव उपस्थित होते.

प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही!

प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्यांच्या नेतृत्वाखाली एकही कर्मचारी काम करणार नाही, असेही तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तोडकर यांनी स्पष्ट केले.