शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंध कागदावर, कोरोना मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बुधवारपासून प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले; पण हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बुधवारपासून प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले; पण हे निर्बंधही कागदावरच असल्याचे चित्र शहरात दिसत होते. कडक निर्बंध असतानाही रस्त्यांवरील गर्दी मात्र हटलेली नव्हती. मुख्य बाजारपेठेसह भाजी मंडई, किराणा व बेकरीत मोठी गर्दी होती. केवळ खाद्यपदार्थांचे हातगाडे व फळ, भाजी विक्रेते मात्र रस्त्यांवरून गायब होते.

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. यात रस्त्यावरील फळ, भाजीसह सर्वच साहित्यविक्री बंद करण्यात आली. खुली मैदाने, माॅर्निंग वाॅकवर बंदी घातली. किराणा दुकानांना साहित्य घरपोच करण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी त्याचा फारसा परिणाम झाल्याचे कुठेच दिसत नव्हते.

शहरातील रस्त्यँवर दिवसभर मोठी गर्दी होती. मुख्य बाजारपेठेतील दुकानांचे शटरच केवळ बंद होते. दुकानांबाहेर व्यापारी व कामगार दिवसभर थांबून होते. ग्राहक येताच शटर उघडून त्यांना आत घेतले जात होते. रस्त्यावरील भाजी व फळविक्री बंद असल्याने भाजीमंडईत गर्दी होती. त्यातही हातगाडी चालकांनी गल्लीबोळांत गाडे उभे केले होते. बेकरीच्या दुकानासमोर तर झुंबड उडाली होती. त्यामुळे निर्बंध कागदावर राहिले असून त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच सुस्त झाली आहे.

चौकट

महापालिकेचे पथक सक्रिय

जिल्ह्यासह शहरात कडक निर्बंध लागू केल्यानंतर महापालिकेचे पथक सक्रिय झाले. साहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटेपासून भाजी व फळविक्रेत्यांना रस्त्यांवर विक्री करण्यास मनाई केली. तसेच मुख्य बाजारपेठेत फिरून लोकांना आवाहनही केले. तरीही बाजारपेठेसह भाजी मंडईत गर्दी दिसत होती. कडक अंमलबजावणी करण्यात महापालिकेनेही हात आखडता घेतला होता.

चौकट

कोण अडविणार?

कडक निर्बंध लागू असतानाही दिवसभर रस्त्यांवर मोठी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा सुरू होती. कुठेच फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. वाहनचालकांना अडवून त्यांची तपासणीही होत नव्हती. ‘आम्हाला कोण अडविणार?’ अशा आविर्भावात नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता.