शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

कोराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रसंगी कठाेर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

सांगली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यात तुलनेने रुग्णांची संख्या कमी आहे. तरीही गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ ...

सांगली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यात तुलनेने रुग्णांची संख्या कमी आहे. तरीही गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ होत आहे. जनतेनेही नियमांचे पालन करावे, नाही तर संसर्ग रोखण्यासाठी प्रसंगी कठाेर निर्णय घ्यावे लागतील, असे आवाहन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी केलेे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमहापौर उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कदम म्हणाले, गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडकपणे अंमलबजावणी करावी. सध्या कोणतेही निर्बंध लागू करण्याविषयी विचार नाही. आठवडा बाजारातील गर्दी कमी करण्याचे नियोजन करावे. वसतिगृहामध्ये राहाणाऱ्या विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी करण्यात यावी. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णास शिक्का मारावा व त्याच्या घराबाहेर फलक लावण्याचेही नियोजन केल्यास तो व्यक्ती बाहेर पडणार नाही.

चौकट

जिल्ह्यातील लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असून, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांनी यास प्रतिसाद दिला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे. याबाबतचे गैरसमज दूर करून प्रशासनाने लसीकरण वाढविण्यासाठी मोहीम राबविण्याच्याही सूचना डॉ. कदम यांनी दिल्या.