शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

कडक निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये ...

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये यासाठीच कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन करताना त्यामुळे काही घटकांना त्रास होत असला, तरी जनतेच्या सुरक्षेसाठीच कडक निर्बंधाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे त्यास विरोध करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत केले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियाेजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांसह इतर घटकांना त्याची झळ बसत आहे. व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या मागण्यांबाबत शासनाला कळविण्यात येईल; पण तोवर व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य द्यावे. लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे अथवा रद्द करण्याचे कोणतेही अधिकार प्रशासनाकडे नाहीत. शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून न घेता प्रशासनास सहकार्य करावे.

जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरसह इतर औषधांचा मुबलक साठा असून, आता तालुका पातळीवरही ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड सेंटर्स उपचारासाठी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

होम आयसोलेशनचे उल्लंघन नको

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारा रुग्ण बाहेर फिरला, तर त्याच्यापासून संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांनी नियमांचे पालन करावे. पोलिसांकडूनही रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांनी क्वारंटाईन कालावधीत प्रशासनास सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

चौकट

शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू, संचारबंदी कडक

शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यामध्ये औषधे, किराणा दुकान, बेकरीसह अत्यावश्यक सेवा नागरिकांना मिळणार आहेत. मात्र संचारबंदी कडक असेल. बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचे कारण असेल तरच घराबाहेर पडावे. या कालावधीत सर्व बंद असले, तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना चालू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.