शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये ...

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये यासाठीच कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन करताना त्यामुळे काही घटकांना त्रास होत असला, तरी जनतेच्या सुरक्षेसाठीच कडक निर्बंधाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे त्यास विरोध करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत केले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियाेजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांसह इतर घटकांना त्याची झळ बसत आहे. व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या मागण्यांबाबत शासनाला कळविण्यात येईल; पण तोवर व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य द्यावे. लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे अथवा रद्द करण्याचे कोणतेही अधिकार प्रशासनाकडे नाहीत. शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून न घेता प्रशासनास सहकार्य करावे.

जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरसह इतर औषधांचा मुबलक साठा असून, आता तालुका पातळीवरही ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड सेंटर्स उपचारासाठी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

होम आयसोलेशनचे उल्लंघन नको

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारा रुग्ण बाहेर फिरला, तर त्याच्यापासून संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांनी नियमांचे पालन करावे. पोलिसांकडूनही रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांनी क्वारंटाईन कालावधीत प्रशासनास सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

चौकट

शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू, संचारबंदी कडक

शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यामध्ये औषधे, किराणा दुकान, बेकरीसह अत्यावश्यक सेवा नागरिकांना मिळणार आहेत. मात्र संचारबंदी कडक असेल. बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचे कारण असेल तरच घराबाहेर पडावे. या कालावधीत सर्व बंद असले, तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना चालू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.