शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांच्या विश्वात वाचन संस्कृतीला मिळतंय बळ

By admin | Updated: April 23, 2016 00:56 IST

पुस्तकांच्या विक्रीत चढ-उतार : तरुणाईच्या मोबाईल वेडामुळे वाचन सवयीचा आलेख घटल्याचे चित्र

शरद जाधव -- सांगली --कालानुरुप पुस्तकांची विक्री कमी-अधिक झाली असली तरी, पुस्तकांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. आजकाल मोबाईलमध्ये रमणाऱ्या पिढीकडून पुस्तक वाचण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी जाणकार करीत असतात. मात्र, स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालल्याने, परीक्षेपुरत्या सीमित स्वरुपात का होईना, वाचन संस्कृती वाढत आहे.शनिवारी, २३ एप्रिलला जगभर साजऱ्या होत असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील पुस्तकांचा आणि वाचकांचा आढावा घेतला असता, काही प्रमाणात सकारात्मक चित्र पाहावयास मिळाले. तरुणांकडून मर्यादित स्वरुपात का होईना, पुस्तके वाचली जात आहेत. आजची तरुणाई सोशल मीडियाच्या विळख्यात अडकून पडल्याची तक्रार होत असतेच. त्यात काही प्रमाणात तथ्यही दिसून येते. केवळ परीक्षेपुरता अभ्यास करणाऱ्या घोकंपट्टी वाचनाला आता प्राधान्य मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र सर्वत्रच दिसते. मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी, जीवन घडविणाऱ्या अनेक गोष्टी मात्र दूर झाल्या आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पुस्तक वाचन होय. शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांशी परिचय नसणाऱ्यांना त्याचे अप्रूप नसतेच, असा एक गैरसमज दूर होत आहे. वाचता येईल इतकेच शिक्षण घेतलेल्यांकडून नियमित पुस्तकांचे वाचन होत असल्याचा आशादायी निष्कर्ष ग्रंथपालांनी व्यक्त केला. सध्या स्पर्धा परीक्षेकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांकडून अभ्यासविषयक का असेना, मात्र पुस्तकांचा अक्षरश: फडशा पाडला जात आहे. मुळात गेल्या पाच वर्षापासून राज्य सेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षांचे स्वरूपही बदलल्याने, विद्यार्थ्यांना अधिक प्रगल्भ करण्याचा हेतू असल्याने, परीक्षार्थींनाही एकाच विषयावरील अनेक पुस्तके वाचावी लागत आहेत. त्यामुळे आपोआपच वाचन संस्कृती जोपासली जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकेच यशस्वी ठरत असल्याचा एकंदर ‘ट्रेंड’ दिसून आला. मराठीतील वाचनीय पुस्तकांबरोबरच नवीन येणाऱ्या पुस्तकांचेही वाचकांकडून स्वागतच होत आहे. मात्र, त्यातही अनुवादित पुस्तकांनाच जास्त प्रतिसाद आहे. तरुण वर्ग वाचत नाही असे नाही, तर जे वाचत आहे, ते अभ्यास करुन वाचायला हवे. सोशल मीडियावर व्यक्त होणारी मते ही देशविघातक ठरु शकतात. त्यामुळे वाचन करुन त्याच्यावर निष्कर्ष काढून मत बनविले पाहिजे. वाचनीयता वाढली तरच संस्कृती रुजते, हा इतिहास असल्याने याकडे लक्ष वेधले गेले पाहिजे. सध्या शांतिनिकेतन ग्रंथालयाने राबविलेला उपक्रम अनुकरणीय आहे. - प्रा. डॉ. भीमराव पाटील, साहित्यिकपुस्तके आवर्जून वाचा...पुस्तकांच्या विक्रीचा घेतलेला आढावा मात्र तितकासा आशादायी नक्कीच नव्हता. ग्रंथालयाच्या माध्यमातून अथवा उपलब्ध झालेली पुस्तके वाचनाकडे ओढा वाढला असला तरी, पुस्तके विकत घेऊन वाचण्याकडे कल वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाचनीयता वाढविण्यापेक्षा ती पुस्तके विकत घेऊन वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्याचा मानस विक्रेत्यांनी व ग्रंथप्रेमींनी व्यक्त केला.