शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्पर्धा परीक्षांच्या विश्वात वाचन संस्कृतीला मिळतंय बळ

By admin | Updated: April 23, 2016 00:56 IST

पुस्तकांच्या विक्रीत चढ-उतार : तरुणाईच्या मोबाईल वेडामुळे वाचन सवयीचा आलेख घटल्याचे चित्र

शरद जाधव -- सांगली --कालानुरुप पुस्तकांची विक्री कमी-अधिक झाली असली तरी, पुस्तकांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. आजकाल मोबाईलमध्ये रमणाऱ्या पिढीकडून पुस्तक वाचण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी जाणकार करीत असतात. मात्र, स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांची संख्या वाढत चालल्याने, परीक्षेपुरत्या सीमित स्वरुपात का होईना, वाचन संस्कृती वाढत आहे.शनिवारी, २३ एप्रिलला जगभर साजऱ्या होत असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील पुस्तकांचा आणि वाचकांचा आढावा घेतला असता, काही प्रमाणात सकारात्मक चित्र पाहावयास मिळाले. तरुणांकडून मर्यादित स्वरुपात का होईना, पुस्तके वाचली जात आहेत. आजची तरुणाई सोशल मीडियाच्या विळख्यात अडकून पडल्याची तक्रार होत असतेच. त्यात काही प्रमाणात तथ्यही दिसून येते. केवळ परीक्षेपुरता अभ्यास करणाऱ्या घोकंपट्टी वाचनाला आता प्राधान्य मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र सर्वत्रच दिसते. मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी, जीवन घडविणाऱ्या अनेक गोष्टी मात्र दूर झाल्या आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पुस्तक वाचन होय. शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांशी परिचय नसणाऱ्यांना त्याचे अप्रूप नसतेच, असा एक गैरसमज दूर होत आहे. वाचता येईल इतकेच शिक्षण घेतलेल्यांकडून नियमित पुस्तकांचे वाचन होत असल्याचा आशादायी निष्कर्ष ग्रंथपालांनी व्यक्त केला. सध्या स्पर्धा परीक्षेकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांकडून अभ्यासविषयक का असेना, मात्र पुस्तकांचा अक्षरश: फडशा पाडला जात आहे. मुळात गेल्या पाच वर्षापासून राज्य सेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षांचे स्वरूपही बदलल्याने, विद्यार्थ्यांना अधिक प्रगल्भ करण्याचा हेतू असल्याने, परीक्षार्थींनाही एकाच विषयावरील अनेक पुस्तके वाचावी लागत आहेत. त्यामुळे आपोआपच वाचन संस्कृती जोपासली जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकेच यशस्वी ठरत असल्याचा एकंदर ‘ट्रेंड’ दिसून आला. मराठीतील वाचनीय पुस्तकांबरोबरच नवीन येणाऱ्या पुस्तकांचेही वाचकांकडून स्वागतच होत आहे. मात्र, त्यातही अनुवादित पुस्तकांनाच जास्त प्रतिसाद आहे. तरुण वर्ग वाचत नाही असे नाही, तर जे वाचत आहे, ते अभ्यास करुन वाचायला हवे. सोशल मीडियावर व्यक्त होणारी मते ही देशविघातक ठरु शकतात. त्यामुळे वाचन करुन त्याच्यावर निष्कर्ष काढून मत बनविले पाहिजे. वाचनीयता वाढली तरच संस्कृती रुजते, हा इतिहास असल्याने याकडे लक्ष वेधले गेले पाहिजे. सध्या शांतिनिकेतन ग्रंथालयाने राबविलेला उपक्रम अनुकरणीय आहे. - प्रा. डॉ. भीमराव पाटील, साहित्यिकपुस्तके आवर्जून वाचा...पुस्तकांच्या विक्रीचा घेतलेला आढावा मात्र तितकासा आशादायी नक्कीच नव्हता. ग्रंथालयाच्या माध्यमातून अथवा उपलब्ध झालेली पुस्तके वाचनाकडे ओढा वाढला असला तरी, पुस्तके विकत घेऊन वाचण्याकडे कल वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाचनीयता वाढविण्यापेक्षा ती पुस्तके विकत घेऊन वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्याचा मानस विक्रेत्यांनी व ग्रंथप्रेमींनी व्यक्त केला.