शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

भांडणापेक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ताकद लावावी

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

निवृत्ती शिंदे : जत तालुक्यातील भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना टोला

उमदी : जत तालुक्यातील कॉँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला वादविवाद थांबवून दोन्ही नेत्यांनी टीकेसाठी ताकद न लावता, म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ती लावली, तर पुण्य लागेल. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी संघर्ष समितीतर्फे आयोजित उमदी-सांगली पदयात्रेला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा देऊन सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत तालुका पाणी संघर्ष समितीचे नेते निवृत्ती शिंदे (सरकार) यांनी व्यक्त केले.तालुका पाणी संघर्ष समितीच्या उमदी-सांगली पदयात्रेसंदर्भात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, अनिल शिंदे, महम्मद कलाल, कांतप्पा शिंदे, मानसिध्द पुजारी, मलाय्या मठपती, दशरथ चव्हाण उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. कायमस्वरूपी पाण्यासाठी आमदार विलासराव जगताप, कॉँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, पी. एम. पाटील, माजी आ. सनमडीकर, मा. आ. प्रकाश शेंडगे, जनस्वराज पक्षाचे नेते बसवराज पाटील या नेत्यांनी मोर्चा काढून जनआंदोलनकेले आहे. अनेक निवडणुकीत एकमेकाविरूध्द अनेकदा टीका झाली आहे.  मात्र जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर एकमेकांविरुध्द अत्यंत खालच्या दर्जाची टीका करणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या तालुका भीषण पाणी टंचाईला सामोरा जात आहे. पिण्याच्या पाण्याची व चाराटंचाई भासत आहे. अशा स्थितीत टीका थांबवून विकासात्मक कामे करणे आवश्यक आहे. तालुका पाणी संघर्ष समितीने २३ जानेवारी २०१४ रोजी प्राणांतिक उपोषण केले. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता. उपोषणावेळी शासनाने दीड वर्षात पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. २३ जून २०१५ रोजी दीड वर्षे पूर्ण होत आहे. मात्र शासनाची ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे संघर्ष समितीने १७ जूनपासून ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी उमदी-सांगली पदयात्रा आयोजित केली आहे, असे शिंदे म्हणाले. (वार्ताहर)