शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

भांडणापेक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ताकद लावावी

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

निवृत्ती शिंदे : जत तालुक्यातील भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना टोला

उमदी : जत तालुक्यातील कॉँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला वादविवाद थांबवून दोन्ही नेत्यांनी टीकेसाठी ताकद न लावता, म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी ती लावली, तर पुण्य लागेल. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी संघर्ष समितीतर्फे आयोजित उमदी-सांगली पदयात्रेला दोन्ही नेत्यांनी पाठिंबा देऊन सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत तालुका पाणी संघर्ष समितीचे नेते निवृत्ती शिंदे (सरकार) यांनी व्यक्त केले.तालुका पाणी संघर्ष समितीच्या उमदी-सांगली पदयात्रेसंदर्भात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, अनिल शिंदे, महम्मद कलाल, कांतप्पा शिंदे, मानसिध्द पुजारी, मलाय्या मठपती, दशरथ चव्हाण उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. कायमस्वरूपी पाण्यासाठी आमदार विलासराव जगताप, कॉँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, पी. एम. पाटील, माजी आ. सनमडीकर, मा. आ. प्रकाश शेंडगे, जनस्वराज पक्षाचे नेते बसवराज पाटील या नेत्यांनी मोर्चा काढून जनआंदोलनकेले आहे. अनेक निवडणुकीत एकमेकाविरूध्द अनेकदा टीका झाली आहे.  मात्र जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर एकमेकांविरुध्द अत्यंत खालच्या दर्जाची टीका करणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या तालुका भीषण पाणी टंचाईला सामोरा जात आहे. पिण्याच्या पाण्याची व चाराटंचाई भासत आहे. अशा स्थितीत टीका थांबवून विकासात्मक कामे करणे आवश्यक आहे. तालुका पाणी संघर्ष समितीने २३ जानेवारी २०१४ रोजी प्राणांतिक उपोषण केले. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता. उपोषणावेळी शासनाने दीड वर्षात पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. २३ जून २०१५ रोजी दीड वर्षे पूर्ण होत आहे. मात्र शासनाची ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे संघर्ष समितीने १७ जूनपासून ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी उमदी-सांगली पदयात्रा आयोजित केली आहे, असे शिंदे म्हणाले. (वार्ताहर)